शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

छत्री तलावातील गाळ पोहोचला शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: June 14, 2015 00:19 IST

शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून..

युवा स्वाभिमानचा पुढाकार : पाणी पातळीत वाढअमरावती : शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. शहरातील एक प्रमुख पिकनिक स्पॉट म्हणून विकसित झालेल्या छत्री तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात न आल्याने या तलावाची पाणी पातळी कमी होत चालली होती. छत्री तलावाचे संवर्धन करण्यासाठी या तलावातील गाळ काढून तो शेतकरी, कुंभार व वीटभट्टी धारकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गाळ काढल्यामुळे छत्री तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे डोळ्यात समावेल एवढा तलावाचा घेर दिसू लागला आहे. शिवाय निघालेल्या गाळाचा लाभ शेतकऱ्यांना, वीटभट्टीधारकांना देण्यात आला आहे. आ. रवी राणा यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमवेत छत्री तलाव परिसराची पाहणी केली. विकासाच्या पुढच्या टप्प्यात छत्री तलावला मुंबईच्या चौपाटीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असून यासाठी योजना आखल्या जातील, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. छत्री तलाव हे अमरावती शहराचे भूषण आहे. अनेक लोक लहान मुलांना घेऊन छत्री तलाव परिसरात मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे या तलावाचे संवर्धन करण्याची गरज ओळखून या तलावातील गाळ व कचरा स्वच्छ करण्यात आला. यापुढे छत्री तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त चंंद्रकांत गुडेवार यांनी दिले. आ. रवी राणा यांनी छत्री तलाव परिसरात मुंबई येथील चौपाटीच्या धर्तीवर नाना-नानी पार्क बनविण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेसाठी संपूूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गुडेवार यांनी दिले. यावेळी विनोद जायसवाल, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)