शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

छत्री तलावातील गाळ पोहोचला शेतकऱ्यांच्या दारी

By admin | Updated: June 14, 2015 00:19 IST

शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून..

युवा स्वाभिमानचा पुढाकार : पाणी पातळीत वाढअमरावती : शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. शहरातील एक प्रमुख पिकनिक स्पॉट म्हणून विकसित झालेल्या छत्री तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात न आल्याने या तलावाची पाणी पातळी कमी होत चालली होती. छत्री तलावाचे संवर्धन करण्यासाठी या तलावातील गाळ काढून तो शेतकरी, कुंभार व वीटभट्टी धारकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गाळ काढल्यामुळे छत्री तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे डोळ्यात समावेल एवढा तलावाचा घेर दिसू लागला आहे. शिवाय निघालेल्या गाळाचा लाभ शेतकऱ्यांना, वीटभट्टीधारकांना देण्यात आला आहे. आ. रवी राणा यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमवेत छत्री तलाव परिसराची पाहणी केली. विकासाच्या पुढच्या टप्प्यात छत्री तलावला मुंबईच्या चौपाटीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असून यासाठी योजना आखल्या जातील, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले. छत्री तलाव हे अमरावती शहराचे भूषण आहे. अनेक लोक लहान मुलांना घेऊन छत्री तलाव परिसरात मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे या तलावाचे संवर्धन करण्याची गरज ओळखून या तलावातील गाळ व कचरा स्वच्छ करण्यात आला. यापुढे छत्री तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त चंंद्रकांत गुडेवार यांनी दिले. आ. रवी राणा यांनी छत्री तलाव परिसरात मुंबई येथील चौपाटीच्या धर्तीवर नाना-नानी पार्क बनविण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेसाठी संपूूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गुडेवार यांनी दिले. यावेळी विनोद जायसवाल, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)