शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

बाजार समितीत शेतकऱ्यांचे धान्य असुरक्षित

By admin | Updated: August 2, 2015 00:30 IST

धान्य बाजाराच्या दिवशी धान्य व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांचे धान्य आणि बाजार समितीच्या शेडमध्ये ....

वजनातही होते हेराफेरी : व्यापाऱ्यांनी पुकारला होता प्रशासनाविरोधात संप, वाढत्या चोऱ्या रोखण्याची मागणी अंजनगाव सुर्जी : धान्य बाजाराच्या दिवशी धान्य व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांचे धान्य आणि बाजार समितीच्या शेडमध्ये साठवून ठेवलेले शेकडो पोते व्यापाऱ्यांचे धान्य असुरक्षित झाले आहे. सततच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांसोबतच व्यापारीदेखील वैतागले आहेत. जुलै महिन्यात तर या चोऱ्यांचा निषेध म्हणून आणि बाजार प्रशासनाच्या नाकर्त्या भूमिकेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. पोलीस प्रशासनाला चोरट्यांचे बंदोबस्त करण्यासाठी निवेदनही दिले होते.मुळात लाखो रुपये उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीत फक्त दोनच सुरक्षा रक्षक रोजंदारीवर कार्यरत होते. चोरीच्या बोंबा वाढल्यावर दोनाचे चार सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले पण या अपुऱ्या आणि बेभरवशाच्या धान्य सुरक्षित राहील काय, हा मोठा प्रश्न आहे. आजपर्यंत चोरीचे अहवाल देणे आणि त्यांची प्रतिलिपी घेणे एवढेच यांत्रिक काम सुरू होते. ना चोरीची दखल ना बाजार समितीने , ना पोलीस प्रशासनाने घेतली. अन्यथा ही समस्या कायम राहिलीच नसती. समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा ठराव करून महिने उलटले. पण त्याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे लावण्याची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. पणन महासंघाची परवानगी राहिली, ई-टेंडर बोलावल्याशिवाय खरेदी करता येत नाही आदी कारणे सांगून व नियमांवर बोट ठेवून प्रशासकांची टोलवाटोलवी चालू आहे. यामुळे चोरीचे सत्र बेधडकपणे सुरू आहे. या समस्येसोबतच धान्याच्या वजनात हेराफेरी होण्याच्या घटनाही अधून मधून घडत राहतात. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी येथे दहा इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे आणून ठेवले व ते गोदामात जंग खात आहेत. मात्र येथील निबंधक कार्यालयाच्या दफ्तरदिरंगाईमुळे हे वजनकाटे न लावणारी ही एकमेव बाजार समिती आहे. समितीचा रहस्यमय व कामचुकार इलेक्ट्रॉनिक धरमकाटासुद्धा असाच मृतावस्थेत पडून आहे. शेतकऱ्यांना येथील निबंधक प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊवन गुंडाळून ठेवले आहे. इलेक्ट्रॉनिक काटे लावण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रिक फिटिंगचा मुहूर्त शोधावा लागेल काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.शेतकरी शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीत आणतात. मात्र खरेदी होईस्तोवर त्यांना तेथे थांबावे लागतात. दरम्यान त्यांना जेवणाचे डबे खाण्यासाठी नीट जागा नसते, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसते. पाण्याची टाकी आहे ती शेवाळलेली. बांधली तेव्हापासून तिचा सफाईचा योगच आला नसावा. शेतकरी शिदोरी मंडप आहे. मात्र ते कायमस्वरुपी बंदावस्थेत दिसून येते. या सोयी-सुविधा कागदोपत्री दाखविण्यात येत असल्यामुळे यावर शासनातर्फे लाखो रुपये प्रशासन उकळतात हेही खरे आहे. पण त्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ नाही. परंतु येथील विश्रामगृहाचा वापर केवळ अधिकारी, कर्मचारी करतात. येथे प्रशस्त जागा असताना झुनका भाकर केंद्र, थंड पाण्याची व्यवस्था, राहण्याची सोय व हिरवळीची संकल्पना कुण्याही अधिकाऱ्यांच्या डोक्यात आलेली नाही. हिरवळ साकारल्यास शेतकऱ्यांना थोडावेळ विश्रांती घेणे शक्य होईल.