शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

किसान संघर्ष समन्वय समितीचे आंदोलन अमरावती : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सर्व सीमेवर देशभरातील ...

किसान संघर्ष समन्वय समितीचे आंदोलन

अमरावती : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सर्व सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे किसान संघर्ष समन्वय समितीने येथील इर्विन चौकात २० सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने कोरोनाकाळात पारित केलेले तीनही कृषी कायदे शेतकरी व जनविरोधी आहे. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा २०२० कायदा शेतमालाला हमी भाव न देता पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याची सूट खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. शेतकरी संरक्षण व सक्षमीकरण शेती सेवा कायदा २०२० अन्वये अत्यावश्यक जीवनाश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूची साठेबाजी आणि काळाबाजार होईल, असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे तीनही कृषी कायदे एमएससीचा कायदा तसेच वीज विधेयक नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात धरणे आंदोलन उभे केले आहे. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक आंदोलकांनी दिली आहे. या आंदोलनात काही संघटना व राजकीय पक्षही सहभागी होणार आहे. यापूर्वी इर्विन चौक येथे किसान संघर्ष समन्वय समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात अशोक सोनारकर, महेश देशमुख, किरण गुडदे, आनंद आमले, वसंत पाटील, दिनेश तायडे नीळकंठ ढोके, यशवंत बादशे, प्रवीण काकड, सुरेश उमाळे, डॉ. रोशन अर्डक, शरद मंगळे, सुमित कोरे, संतोष कोल्हे, हिमांशु अतकरे आदी सहभागी झाले आहेत.