शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:14 IST

किसान संघर्ष समन्वय समितीचे आंदोलन अमरावती : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सर्व सीमेवर देशभरातील ...

किसान संघर्ष समन्वय समितीचे आंदोलन

अमरावती : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सर्व सीमेवर देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे किसान संघर्ष समन्वय समितीने येथील इर्विन चौकात २० सप्टेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने कोरोनाकाळात पारित केलेले तीनही कृषी कायदे शेतकरी व जनविरोधी आहे. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा २०२० कायदा शेतमालाला हमी भाव न देता पर्यायी बाजार व्यवस्था निर्माण करण्याची सूट खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. शेतकरी संरक्षण व सक्षमीकरण शेती सेवा कायदा २०२० अन्वये अत्यावश्यक जीवनाश्यक वस्तू कायद्यातून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूची साठेबाजी आणि काळाबाजार होईल, असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीने केला आहे. त्यामुळे तीनही कृषी कायदे एमएससीचा कायदा तसेच वीज विधेयक नव्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात धरणे आंदोलन उभे केले आहे. २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक आंदोलकांनी दिली आहे. या आंदोलनात काही संघटना व राजकीय पक्षही सहभागी होणार आहे. यापूर्वी इर्विन चौक येथे किसान संघर्ष समन्वय समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. यात अशोक सोनारकर, महेश देशमुख, किरण गुडदे, आनंद आमले, वसंत पाटील, दिनेश तायडे नीळकंठ ढोके, यशवंत बादशे, प्रवीण काकड, सुरेश उमाळे, डॉ. रोशन अर्डक, शरद मंगळे, सुमित कोरे, संतोष कोल्हे, हिमांशु अतकरे आदी सहभागी झाले आहेत.