शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनासाठी शेतकरी एकवटले

By admin | Updated: July 29, 2016 00:26 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसह अन्य बँकांनी कर्ज पुनर्गठन आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत.

आंदोलन : किसान एकता मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेसह अन्य बँकांनी कर्ज पुनर्गठन आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांच्या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ जुलै रोजी किसान एकता मंचतर्फे पालकमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोलताशाच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये निधीअभावी कर्ज पुनर्गठन करण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेने चालविला आहे. तोकड्या स्वरूपाचा आहे. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या कर्जात शेती करणे अशक्य आहे. नियमित कर्जधारकांना नाबार्डच्या धोरणाप्रमाणे वाढीव कर्जपुरवठा करण्याऐवजी शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जापेक्षाही कमी कर्जपुरवठा सहकारी सोसायट्या करीत आहेत. राज्य शासनाने सन २०१२ पासूनच्या सर्व थकीत शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन प्रक्रियेत सामावून घेण्याचे धोरण जाहीर केलेले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्ज पुनर्गठनात उचित भूमिका घेत असल्या तरी बँक शाखा व्यवस्थापकांनी आडमुठे धोरण राबविल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात सुधारणा करावी, सहकारी बँकांनी राष्ट्रीयकृत बॅकाप्रमाणे कर्ज पुरवठा करावा, बँकेतील कर्ज प्रकरणातील वशिलेबाजी कमी करावी, अशा मागण्याकडे शासनाचे निवेदनाव्दारे लक्ष वेधले. यावेळी किसान एकता मंचचे संजय कोल्हे, गोविंद इसळ, प्रवीण राऊत, राजेंद्र पारीसे, अरूण शेळके, राजेद्र पाथ्रे, दीपक घोगरे, निकेश अघाडे, निजय लिखितकर आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)