शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Updated: April 25, 2017 00:03 IST

शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली.

शासनाचे घुमजाव : फक्त यार्डातली तूर खरेदी करणार, खुल्या बाजारात भावात घसरणअमरावती : शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली. सद्यस्थितीत बाजार समित्यांच्या यार्डात अडीच लाखांवर पोते व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील दहाही तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. सोमवारी मुदतवाढ मिळण्याचीे आशाही संपुष्टात आली. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी मोठ्या फरकात भाव पाडल्याने शेतकरी कमालीचे संतापले. शासनाने २६ ते २८ डिसेंबर २०१६ पासून जिल्ह्यातील १० केंद्रांवर शासकीय तूर खरेदी सुरू केली. ही केंद्र आतापर्यंत जेवढे दिवस सुरू होती त्यापेक्षा अधिक दिवस बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणांमुळे बंद राहिली. त्यामुळे या केंद्रांवर मोजणीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागली. या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल रोजी केंद्राने सर्व केंद्र बंद केल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा?अमरावती : अखेर शासनाला उपरती झाली व केंद्रांना १७ ते २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील बारदाना संपल्याने भंडारा येथून १ लाख बारदाना मागविण्यात आला. एफसीआयला भाडेतत्त्वावर देण्यात आला. या सर्व कसरती होऊन केंद्र सुरू झाली तर आता शनिवारपासून पुन्हा बंद करण्यात आली. दरम्यान नाफेडच्या राज्य संचालक विनाकुमारी यांनी जिल्ह्यासह विभागातील काही केंद्रांना भेटी दिल्यात. त्यांना शेतकरी संतापाचा सामना करावा लागला. त्यांना देखील मुदतवाढीसाठी शासनाला प्रस्ताव दिला. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनीदेखील जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमुद करून सर्व केंद्राला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणनच्या अप्पर मुख्य सचिवांना दिला. मात्र अद्यापपावेतो शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळाली नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहे. सर्वच तालुक्यात तहसीलदारांना व जिल्हाधिकाऱ्यांना या विषयीचे निवेदन देण्यात आली आहेत. या केंद्रावर सध्या अडीच लाख तुरीचे पोते पडून असल्याने शेतकरी कमालीचे संतप्त आहे. तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचाच माल अधिक असतो. किंबहुना यंत्रणांशी त्यांची हातमिळवणी असल्याने त्यांच्या मालास प्राधान्याने टोकन दिले जाते, याविषयी तक्रारी झाल्याने शासनाने १०० क्विंटलवर तुरीची विक्री करणाऱ्यांपैकी शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी कोणते ? हे शोधण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लावली. बाजार समितीमधील तुरीचे आवक रजिस्टर ताब्यात घेवून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत नव्याने रजिस्टर ठेवण्यात आले व यापूर्वी शंभर क्विंटलच्यावर तूर विकणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ११३ शेतकरी आढळले. मात्र यामध्ये शेतकऱ्याच्या नावाच्या आड व्यापारी कोण? हे मात्र गुलदस्त्यात आहे. अद्याप एकाही व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने शासनाचा हा फुसका बार ठरला आहे. (प्रतिनिधी)लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून शासकीय खरेदी केंद्रांवर सुरुवातीच्या काळात खरेदी झालेली बहुतांश तूर ही व्यापाऱ्यांची होती. शेतकरी मात्र खुल्या बाजारात तुरीचे दर वाढतीत या अपेक्षित राहिले. मात्र तुरीचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याने आता कुठे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली. अजूनही लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. शनिवारपासून केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. १.१५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार जिल्ह्यातील दहाही तुरीचे केंद्र २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आले. मात्र त्या दिनांकापर्यंत केंद्रावर जेवढ्या तुरीची आवक झाली व जी तूर खरेदी व्हायची आहे तेवढ्याच तुरीची खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी व्ही.सी.द्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे जिल्ह्यातील यार्डात पडून असलेली १.१५ क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे.व्यापाऱ्यांनी १२०० रुपयांनी पाडले भावतूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळणार नसल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले. हमीभावापेक्षा १२०० ते १५०० रुपयांनी कमी दरात तुरीची खरेदी करण्यात आली. अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला ३५०० ते ३९५० रुपये भाव मिळाला. शनिवारपर्यंत हेच भाव ३५०० ते ५०५० या दरम्यान होते. व्यापाऱ्यांच्या या षडयंत्रावर शासन काय कारवाई करणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत जी तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तीच तूर खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार १.१५ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात येईल. - के.पी. परदेशी, जिल्हाधिकारी