शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

By admin | Updated: April 25, 2017 00:03 IST

शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली.

शासनाचे घुमजाव : फक्त यार्डातली तूर खरेदी करणार, खुल्या बाजारात भावात घसरणअमरावती : शेतकऱ्यांजवळील तुरीचा अखरेचा दाणा असेतोवर शासन खरेदी करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिली. सद्यस्थितीत बाजार समित्यांच्या यार्डात अडीच लाखांवर पोते व यापेक्षा अधिक तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील दहाही तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले. सोमवारी मुदतवाढ मिळण्याचीे आशाही संपुष्टात आली. खुल्या बाजारात व्यापाऱ्यांनी मोठ्या फरकात भाव पाडल्याने शेतकरी कमालीचे संतापले. शासनाने २६ ते २८ डिसेंबर २०१६ पासून जिल्ह्यातील १० केंद्रांवर शासकीय तूर खरेदी सुरू केली. ही केंद्र आतापर्यंत जेवढे दिवस सुरू होती त्यापेक्षा अधिक दिवस बारदाना नाही, गोदाम नाही आदी कारणांमुळे बंद राहिली. त्यामुळे या केंद्रांवर मोजणीसाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागली. या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल रोजी केंद्राने सर्व केंद्र बंद केल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई केव्हा?अमरावती : अखेर शासनाला उपरती झाली व केंद्रांना १७ ते २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्यातील बारदाना संपल्याने भंडारा येथून १ लाख बारदाना मागविण्यात आला. एफसीआयला भाडेतत्त्वावर देण्यात आला. या सर्व कसरती होऊन केंद्र सुरू झाली तर आता शनिवारपासून पुन्हा बंद करण्यात आली. दरम्यान नाफेडच्या राज्य संचालक विनाकुमारी यांनी जिल्ह्यासह विभागातील काही केंद्रांना भेटी दिल्यात. त्यांना शेतकरी संतापाचा सामना करावा लागला. त्यांना देखील मुदतवाढीसाठी शासनाला प्रस्ताव दिला. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनीदेखील जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमुद करून सर्व केंद्राला १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणनच्या अप्पर मुख्य सचिवांना दिला. मात्र अद्यापपावेतो शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळाली नसल्याने शेतकरी कमालीचे संतप्त झाले आहे. सर्वच तालुक्यात तहसीलदारांना व जिल्हाधिकाऱ्यांना या विषयीचे निवेदन देण्यात आली आहेत. या केंद्रावर सध्या अडीच लाख तुरीचे पोते पडून असल्याने शेतकरी कमालीचे संतप्त आहे. तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांचाच माल अधिक असतो. किंबहुना यंत्रणांशी त्यांची हातमिळवणी असल्याने त्यांच्या मालास प्राधान्याने टोकन दिले जाते, याविषयी तक्रारी झाल्याने शासनाने १०० क्विंटलवर तुरीची विक्री करणाऱ्यांपैकी शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी कोणते ? हे शोधण्यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा कामाला लावली. बाजार समितीमधील तुरीचे आवक रजिस्टर ताब्यात घेवून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत नव्याने रजिस्टर ठेवण्यात आले व यापूर्वी शंभर क्विंटलच्यावर तूर विकणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ११३ शेतकरी आढळले. मात्र यामध्ये शेतकऱ्याच्या नावाच्या आड व्यापारी कोण? हे मात्र गुलदस्त्यात आहे. अद्याप एकाही व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने शासनाचा हा फुसका बार ठरला आहे. (प्रतिनिधी)लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून शासकीय खरेदी केंद्रांवर सुरुवातीच्या काळात खरेदी झालेली बहुतांश तूर ही व्यापाऱ्यांची होती. शेतकरी मात्र खुल्या बाजारात तुरीचे दर वाढतीत या अपेक्षित राहिले. मात्र तुरीचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याने आता कुठे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली. अजूनही लाखों क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. शनिवारपासून केंद्र बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. १.१५ लाख क्विंटल तूर खरेदी होणार जिल्ह्यातील दहाही तुरीचे केंद्र २२ एप्रिल रोजी बंद करण्यात आले. मात्र त्या दिनांकापर्यंत केंद्रावर जेवढ्या तुरीची आवक झाली व जी तूर खरेदी व्हायची आहे तेवढ्याच तुरीची खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी व्ही.सी.द्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे जिल्ह्यातील यार्डात पडून असलेली १.१५ क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे.व्यापाऱ्यांनी १२०० रुपयांनी पाडले भावतूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळणार नसल्याने सोमवारी व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तुरीचे भाव पाडले. हमीभावापेक्षा १२०० ते १५०० रुपयांनी कमी दरात तुरीची खरेदी करण्यात आली. अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला ३५०० ते ३९५० रुपये भाव मिळाला. शनिवारपर्यंत हेच भाव ३५०० ते ५०५० या दरम्यान होते. व्यापाऱ्यांच्या या षडयंत्रावर शासन काय कारवाई करणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत जी तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तीच तूर खरेदी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार १.१५ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात येईल. - के.पी. परदेशी, जिल्हाधिकारी