शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे

By admin | Updated: November 30, 2014 22:58 IST

दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन

अमरावती : दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यात जाणवायला लागल्या, दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून आहे. खरीप २०१४ हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस नंतर पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, पीकवाढीला न मिळालेला अवधी, यामुळे खरीप हंगामात सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्के उत्पन्नात घट झाली. वेळेअभावी मूग, उडदाचे पीक हातचे निघून गेले. सोयाबीननेही निराशा केली. एकरी पोत्याची झडती होत आहे, शेंगा पोचट व दाणा बारीक पडल्याने हमीभावाएवढाही भाव मिळाला नाही. उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पन्न झाले नाही. दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनने धोका दिला. कपाशीचीही तीच गत आहे. लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीचे बोंड फुटायला तयार नाही, हिवाळ्यात रोपे केमेजू लागली आहे. काही ठिकाणी पिवळी पडायला लागली आहे. मूग, उडीद, सोयाबीन हातचा गेल्यामुळे कपासी, तूर, गहू, हरभरा तरी सहाय्य करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. नोव्हेंबर अखेर रबीची ३० टक्केही पेरणी झाली. जमिनीत आर्द्रता नसल्याने हरभऱ्यांची उगवणशक्ती कमी झाली आहे. निघालेले हरभरा पीक आर्द्रतेअभावी कोमेजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची खरीपाची सुधारित आणेवारी ४६ पैसे जाहीर झाली. परिणामी दुष्काळाच्या सवलती व योजना मिळण्याची शक्यता आहे. शासन मदतीचा हात केव्हा देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. धरणामधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईचे सावट आहेत. तसेच वैरणीची समस्या उन्हाळ्यात जाणवणार आहे. (प्रतिनिधी)