शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे

By admin | Updated: November 30, 2014 22:58 IST

दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन

अमरावती : दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यात जाणवायला लागल्या, दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून आहे. खरीप २०१४ हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस नंतर पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, पीकवाढीला न मिळालेला अवधी, यामुळे खरीप हंगामात सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्के उत्पन्नात घट झाली. वेळेअभावी मूग, उडदाचे पीक हातचे निघून गेले. सोयाबीननेही निराशा केली. एकरी पोत्याची झडती होत आहे, शेंगा पोचट व दाणा बारीक पडल्याने हमीभावाएवढाही भाव मिळाला नाही. उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पन्न झाले नाही. दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनने धोका दिला. कपाशीचीही तीच गत आहे. लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीचे बोंड फुटायला तयार नाही, हिवाळ्यात रोपे केमेजू लागली आहे. काही ठिकाणी पिवळी पडायला लागली आहे. मूग, उडीद, सोयाबीन हातचा गेल्यामुळे कपासी, तूर, गहू, हरभरा तरी सहाय्य करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. नोव्हेंबर अखेर रबीची ३० टक्केही पेरणी झाली. जमिनीत आर्द्रता नसल्याने हरभऱ्यांची उगवणशक्ती कमी झाली आहे. निघालेले हरभरा पीक आर्द्रतेअभावी कोमेजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची खरीपाची सुधारित आणेवारी ४६ पैसे जाहीर झाली. परिणामी दुष्काळाच्या सवलती व योजना मिळण्याची शक्यता आहे. शासन मदतीचा हात केव्हा देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. धरणामधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईचे सावट आहेत. तसेच वैरणीची समस्या उन्हाळ्यात जाणवणार आहे. (प्रतिनिधी)