शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे

By admin | Updated: November 30, 2014 22:58 IST

दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन

अमरावती : दोन महिने दडी मारलेल्या पावसाने खरीप २०१४ चा हंगाम गारद केला. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे रबीची पेरणीदेखील खोळंबली आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पाणीटंचाईच्या झळा ऐन हिवाळ्यात जाणवायला लागल्या, दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून आहे. खरीप २०१४ हंगामात पेरणीपासून दोन महिने उशिरा पाऊस नंतर पावसात खंड, निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव, पीकवाढीला न मिळालेला अवधी, यामुळे खरीप हंगामात सरासरीपेक्षा ५० ते ७० टक्के उत्पन्नात घट झाली. वेळेअभावी मूग, उडदाचे पीक हातचे निघून गेले. सोयाबीननेही निराशा केली. एकरी पोत्याची झडती होत आहे, शेंगा पोचट व दाणा बारीक पडल्याने हमीभावाएवढाही भाव मिळाला नाही. उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पन्न झाले नाही. दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनने धोका दिला. कपाशीचीही तीच गत आहे. लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीचे बोंड फुटायला तयार नाही, हिवाळ्यात रोपे केमेजू लागली आहे. काही ठिकाणी पिवळी पडायला लागली आहे. मूग, उडीद, सोयाबीन हातचा गेल्यामुळे कपासी, तूर, गहू, हरभरा तरी सहाय्य करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. नोव्हेंबर अखेर रबीची ३० टक्केही पेरणी झाली. जमिनीत आर्द्रता नसल्याने हरभऱ्यांची उगवणशक्ती कमी झाली आहे. निघालेले हरभरा पीक आर्द्रतेअभावी कोमेजू लागले आहे. त्यामुळे शेतकरी अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची खरीपाची सुधारित आणेवारी ४६ पैसे जाहीर झाली. परिणामी दुष्काळाच्या सवलती व योजना मिळण्याची शक्यता आहे. शासन मदतीचा हात केव्हा देणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. धरणामधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईचे सावट आहेत. तसेच वैरणीची समस्या उन्हाळ्यात जाणवणार आहे. (प्रतिनिधी)