शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देसोयाबीन गेले : कपाशी वेचणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मान्सूनचे चार महिने संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या प्रकाशपर्व कसे साजरे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असताना, घरात ना सोयाबीन, ना कापूस; अशी शेतकऱ्याची झाली आहे.यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पुढील पेरणीचे नियोजन ठरलेले असते. यामुळे शेतकरी वर्ग या दोन्ही पिकांना आपली पहिली पसंती देतो. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस अधिक लांबल्याने सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी कापणी झालेली असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेले हे पीक पावसामुळे सडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदानाच्या निकालाने तालुक्यात गजबजाट असला तरी पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मुलामुलींचे कपडे कसे घ्यायचे ?सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह कुटुंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो. मात्र, यंदा त्याचे स्वप्न या परतीच्या पावसात वाहून गेले आहे. यंदा पावसामुळे कपाशी पिकाच्या पाती गळू लागल्या, तर बोंडाची वाढ खुंटल्याने सीतादही होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीFarmerशेतकरी