शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देसोयाबीन गेले : कपाशी वेचणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : मान्सूनचे चार महिने संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन मातीमोल झाले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या प्रकाशपर्व कसे साजरे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असताना, घरात ना सोयाबीन, ना कापूस; अशी शेतकऱ्याची झाली आहे.यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या महत्त्वाच्या सणाच्या वेळेस घरात येत असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, तर कपाशीचा हंगाम मार्चपर्यंत लांबत असल्याने हे पीक शेतकऱ्यांकरीता पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. त्यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे पुढील पेरणीचे नियोजन ठरलेले असते. यामुळे शेतकरी वर्ग या दोन्ही पिकांना आपली पहिली पसंती देतो. मात्र, यावर्षी परतीचा पाऊस अधिक लांबल्याने सोयाबीन पीक घरी आणण्यासाठी कापणी झालेली असताना मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेले हे पीक पावसामुळे सडू लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही, असे चित्र आहे. मतदानाच्या निकालाने तालुक्यात गजबजाट असला तरी पावसाने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मुलामुलींचे कपडे कसे घ्यायचे ?सोयाबीन या पिकावर अवलंबून असलेला शेतकरी दिवाळीत मुलामुलींच्या कपड्यालत्त्यासह कुटुंबातील विवाह प्रसंगाचे नियोजन करतो. मात्र, यंदा त्याचे स्वप्न या परतीच्या पावसात वाहून गेले आहे. यंदा पावसामुळे कपाशी पिकाच्या पाती गळू लागल्या, तर बोंडाची वाढ खुंटल्याने सीतादही होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीFarmerशेतकरी