शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:12 IST

पान ३ साठी तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती ...

पान ३ साठी

तिवसा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून मंजूर करून घेतलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून अनेक शेतकऱ्यांची शेती वगळण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने लढा संघटनेच्यावतीने ना. बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले.

अप्पर वर्धा धरणातून मोझरी आणि इतर शेतीभागाला एक थेंब पाणी मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांनी २००२ पासून साखळी तथा बेमुदत उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयात घंटानाद मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आमदार बच्चू कडू आणि संजय देशमुख यांनी सतत पाठपुरावा करून तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या कडून गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली. मोझरीच्या आजूबाजूचा भाग सुजलाम सुफलाम होईल, अशी आशा असताना शेंदोळा बु, सालोरा, धोत्रा या गावातील संपूर्ण भाग तसेच वऱ्हा हे गाव योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. शेतीला पाणी मिळाले नाही, तर शेतकरी आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचे ना. कडू यांना सांगण्यात आले. निवेदन देताना लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, मुरली मदनकर, मनोहर वाढोनकर, विलास इंगोले, श्रीराम समरीत, मोतीराम गायकवाड, जीवन उमप, विजय डेहनकर, ओंकार कळंबे, घनश्याम गाढवे, काजळकर आदी शेतकरी उपस्थित होते.

--------------------