शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: June 18, 2015 00:32 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची...

पेरणीला वेग : उच्च प्रतीकडे कलभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा कल उच्च प्रतीच्या बियाण्यांकडे असल्याचे कृषी केंद्रावर होत असलेल्या गर्दीवरुन दिसते.धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला प्रारंभ करतो. धानाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उच्च प्रतीच्या धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येते. उच्च प्रतीच्या बियाणांमध्ये खजाना वाय एस आर, सुपर सोना, केशर, श्री १००८ चा समावेश आहे. त्याची किंमत क्रमश: ५८० रुपये (१० किलो), याचप्रमाणे सुपर सोना ६३० रुपये (१० किलो), केशर ६५० रुपये (१० किलो) आणि श्री १००८ -६३० रुपये (१० किलो) सांगण्यात आली. याचबरोबर अन्य बियाण्यांमध्ये पी के वी (एचएमटी) ७५० रुपये (२५ किलो), सुवर्णा ७३० रुपये (२५ किलो), एम टी यू १०१० -६८० रुपये (२५ किलो), श्रीराम ५०० रुपये (१०किलो), जे जी एम १७९८- ७५० रुपये (२५ किलो), सिडम श्री १०१-४०० रुपये (६ किलो), पद्मा ३६० रुपये (६ किलो), सोना राजा ५८० रुपये (१० किलो), जय श्रीराम ५८० रुपये(१० किलो) आणि अक्षत ६३० रुपये (१० किलो) विक्री करण्यात येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या खरेदीत घट झाली असल्याचे कृषी केंद्र संचालक सांगतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासह सोयाबीन ५ हजार क्विंटल मागणीपैकी ७०० क्विंटल सोयाबिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तुर ४५० क्विंटल मागणीपैकी ३०५ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)१,५८१ कृषी केंद्र शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे, कीटकनाशक आणि खते उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात एकूण १५८१ कृषी केंद्र कार्यरत आहेत. यात ४४८ बियाणे केंद्र, ४४८ कीटकनाशक केंद्र आणि ६८५ खतांच्या केंद्रांचा समावेश आहे.