शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: June 18, 2015 00:32 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची...

पेरणीला वेग : उच्च प्रतीकडे कलभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांचा कल उच्च प्रतीच्या बियाण्यांकडे असल्याचे कृषी केंद्रावर होत असलेल्या गर्दीवरुन दिसते.धानाचे कोठार म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला प्रारंभ करतो. धानाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी उच्च प्रतीच्या धानाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येते. उच्च प्रतीच्या बियाणांमध्ये खजाना वाय एस आर, सुपर सोना, केशर, श्री १००८ चा समावेश आहे. त्याची किंमत क्रमश: ५८० रुपये (१० किलो), याचप्रमाणे सुपर सोना ६३० रुपये (१० किलो), केशर ६५० रुपये (१० किलो) आणि श्री १००८ -६३० रुपये (१० किलो) सांगण्यात आली. याचबरोबर अन्य बियाण्यांमध्ये पी के वी (एचएमटी) ७५० रुपये (२५ किलो), सुवर्णा ७३० रुपये (२५ किलो), एम टी यू १०१० -६८० रुपये (२५ किलो), श्रीराम ५०० रुपये (१०किलो), जे जी एम १७९८- ७५० रुपये (२५ किलो), सिडम श्री १०१-४०० रुपये (६ किलो), पद्मा ३६० रुपये (६ किलो), सोना राजा ५८० रुपये (१० किलो), जय श्रीराम ५८० रुपये(१० किलो) आणि अक्षत ६३० रुपये (१० किलो) विक्री करण्यात येत आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाण्यांच्या खरेदीत घट झाली असल्याचे कृषी केंद्र संचालक सांगतात. भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने ३८ हजार क्विंटल बियाण्यांची व ६७ हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी केली. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून १७ हजार क्विंटल बियाणे व १० हजार मेट्रीक टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यासह सोयाबीन ५ हजार क्विंटल मागणीपैकी ७०० क्विंटल सोयाबिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तुर ४५० क्विंटल मागणीपैकी ३०५ क्विंटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)१,५८१ कृषी केंद्र शेतकऱ्यांना लागवडीसाठी आवश्यक बियाणे, कीटकनाशक आणि खते उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात एकूण १५८१ कृषी केंद्र कार्यरत आहेत. यात ४४८ बियाणे केंद्र, ४४८ कीटकनाशक केंद्र आणि ६८५ खतांच्या केंद्रांचा समावेश आहे.