शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

शेतकरी वन्यपशूंपासून असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST

कावली वसाड : माणसांप्रमाणे पशूपक्ष्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगलात राहणाऱ्या प्रत्येक जिवाला ...

कावली वसाड : माणसांप्रमाणे पशूपक्ष्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगलात राहणाऱ्या प्रत्येक जिवाला संरक्षण मिळाले आहे. मात्र, वन्यपशूंच्या शिवारातील वाढत्या संख्येमुळे शेतकऱ्यांचे जीवन असुरक्षित झाले आहे.

एकीकडे पाऊस थांबल्यामुळे शेतात टाकलेले बियाणे माकडे, रोही, रानडुक्कर आदी वन्यपशू खात आहेत. त्यांच्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी शेतकरी धडपडत आहेत. कितीही बंदोबस्त केला तरी केला तरी रानडुक्कर शेतात घुसून बियाणे व निघालेली रोपे खातात. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण शेतातील पीक जमीनदोस्त करतात. आता मात्र ते गावात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दाभाडा तसेच कावली भागातील शेतकरी-शेतमजुरांना शेतात काम करीत असताना रानडुकरांकडून जखमी करण्यात आल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्यांच्या बंदोबस्ताकडे वनविभागाने लक्ष दिलेले नाही. हरीण, निलगाय यांसारखे प्राणी मोसंबी, संत्र्याची फळबाग नष्ट करीत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत.

-------------------

फटाक्यांचा आवाज झाला परिचित

अनेक शेतकऱ्यांनी शेताला तारेचे कुंपण केले. विजेचा धोका लक्षात घेऊन सौर ऊर्जाधारित करंट मशीनचा वापर केला. काही शेतकऱ्यांनी कॅल्शियम कार्बोनेटच्या खड्यांची बंदूक वापरली. काही दिवस त्याच्यातून होणाऱ्या मोठ्या आवाजाने वन्यप्राणी घाबरले, पण या आवाजाचा त्यांना आता सराव झाला आहे. त्यामुळे जागलीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्र काढावी लागते.

-------------------तूर फस्त

शेतकऱ्यांनी यावर्षी तूर या पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड झाली आहे. त्यांनी शेतातून पाय काढताच रानडुकरांनी बियाणे उकरून फस्त केल्याचे चित्र परिसरात आहे.

--------------------

चोरट्यांचा धुमाकूळ

शेतात झोपडी बांधून तेथे ठेवलेले साहित्य शिवारात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरांचे लक्ष्य बनत आहेत. एवढेच नव्हे तर वन्यप्राण्यांना घाबरवण्यासाठी लावलेली झटका मशीनदेखील ते चोरून नेत आहेत.