शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याने फुलविले हिरवे स्वप्न

By admin | Updated: January 31, 2015 00:58 IST

चांदूररेल्वे तालुक्यातील कोहळा (खानापूर) अवघ्या ४०० लोकसंख्येचे गाव, अभावानेच असणारे सिंचन, परंतु शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत चार शेततळे तयार करण्यात आलेत.

गजानन मोहोड अमरावतीचांदूररेल्वे तालुक्यातील कोहळा (खानापूर) अवघ्या ४०० लोकसंख्येचे गाव, अभावानेच असणारे सिंचन, परंतु शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत चार शेततळे तयार करण्यात आलेत. पुरामुळे विहीर बुजल्यानंतर सिंचन कसे करावे? या चिंतेत असणाऱ्या प्रकाश रामसिंग सोळंके या तरुण शेतकऱ्याला शेततळ्याने संजीवनी मिळाली. एकाच शेततळ्यावर ८ एकर हरभरा व ३ एकरात गहू पीक डौलाने उभा आहे. जिद्द न सोडता, हार न मानता, सोळंके यांनी जिरायती शेतात ११ एकरांत तुषार सिंचन केले. अत्यंत कमी पाण्यात व कमी पैशात किमान चार लाखांचे उत्पन्न रबी हंगामातून मिळण्याची अपेक्षा सोळंके यांनी व्यक्त केली आहे. चांदूररेल्वे तालुक्याच्या टोकावर असलेले कोहळा (खानापूर) गाव येथे मूलस्थानी जलसंधारणाचे कामे नाहीत. त्यामुळे जमिनीतदेखील पाण्याची पातळी कमी. त्यामुळे या गावाची चांदूररेल्वे कृषी अधिकारी कार्यालयाने कोरडवाहू शेती अभियान या कार्यक्रमात निवड करण्यात आली. गावात १९ शेतकरी गट स्थापन करण्यात आले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गावात चार शेततळे तयार करण्यात आले. यापैकी एक प्रताप सोळंके यांच्या शेतात ३० बाय ३० मीटर लांबी व रुंदीचे शेततळे २०१३-१४ मध्ये खोदण्यात आले. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु जे काही पाणी शेतामधून वाहून निघाले ते शेततळ्यात जमा झाले व शेततळ्याच्या पाण्यावर निर्भर राहून सोळंके यांनी ८ एकर हरभरा व ३ एकरात गव्हाची पेरणी केली. आवश्यकतेनुसार स्प्रिंक्लरने पाणी दिले. आज हे पीक उत्तमरीत्या बहरले आहे. हरभरा फुलोऱ्यावर आहे. किमान एकरी १० ते १२ क्विंटल असे ८० ते ९० क्विंटल उत्पन्न होईल, अशी आशा आहे. गहूदेखील ओंबीवर असून १० ते १२ पोते एकरी उत्पन्न होईल, अशी आशा सोळंके यांनी व्यक्त केली. सिंचनाची वानवा असताना उमेद न हारता सोळंके यांनी कृषी विभागाच्या योजनेचा आधार घेऊन हिरवे स्वप्न फुलविले.