शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कार्यारंभ आदेशाअभावी काठी बंधार्‍याचा निधी परतला

By admin | Updated: May 27, 2014 00:22 IST

राज्य शासनामार्फत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरुड तालुक्यातील साठवण बंधारा काठी या बंधार्‍याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

अमरावती : राज्य शासनामार्फत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरुड तालुक्यातील साठवण बंधारा काठी या बंधार्‍याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विहित मुदतीत कार्यारंभ आदेश न दिल्यामुळे या प्रकल्पाच्या सुमारे ३४ लाख रुपयांचा निधी परत गेला. त्यामुळे या मुद्यावर सोमवारी जल व्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्य गिरीश कराळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत वरुड तालुक्यातील काठी येथे साठवण बंधारा मंजूर केला होता. या कामासाठीची निविदा प्रक्रिया ११ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूर केली होती. सुमारे ३४ लाख ५१ हजार ६0 रुपये किमतीच्या या कामाच्या निविदा प्रक्रियेची किंमत २४ लाख ७0 हजार ८८ एवढी होती. ३.५ टक्के कमी दराने असलेली ही निविदा वरील तारखेला मंजूर केल्यानंतर काठी साठवण बंधार्‍याच्या कामाची मंजूर झालेली ही फाईल सोमवारी २६ मे रोजी बाहेर काढण्यात आली.

मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेचा कार्यारंभ आदेश जिल्हा परिषद सिंचन विभागाने विहित मुदतीत न दिल्यामुळे या तलावाचे ३४ लाख रुपये शासनकडे परत गेले. त्यामुळे वरुड तालुक्याची सिंचनातील प्रगती खुंटली आहे, असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गिरीश कराळे यांनी लावून धरला. या मुद्यावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन अध्यक्षांनी सभागृहात दिले. याशिवाय जलव्यवस्थापन समितीच्या सभेत विदर्भ सधन सिंचन विभाग कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने आराखड्यातील विविध विकासकामे मंजूर केली आहेत. मात्र ही मंजूर कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येऊ नये, असे तोंडी आदेश राज्याच्या जलसंधारण विभागाच्या सचिवांनी दिल्यामुळे कोट्यवधी रुपयांची सिंचनाची कामे जिल्हा परिषदेत ठप्प पडली आहेत.

मात्र हा निर्णय प्रधान सचिवांनी दिला असला तरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा यावर भाष्य करण्यास तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गिरीश कराळे यांनी केली. वीज वितरण कंपनीमार्फत नवीन वीज जोडणीची जिल्हय़ात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत. अशावेळी पावसाच्या लहरीपणात कृषिपंपांचा आधार ओलितासाठी महत्त्वाचा ठरतो. परंतु कृषिपंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित असल्यामुळे शेतकरी चांगले संतप्त झाले आहेत. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले. याशिवाय ही सभा पाणी टंचाई, सिंचन अशा विविध मुद्यांवर चांगलीच गाजली.

सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सभापती महेंद्रसिंग गैलवार, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, सदस्य गिरीश कराळे, ज्योती आरेकर, सीईओ अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षीरसागर, पाणी पुरवठय़ाचे अभियंता श्‍वेता बॅनर्जी आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)