शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
4
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाची गद्दारी
5
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
6
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
7
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
8
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
9
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
10
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
11
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
12
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
13
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
14
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
15
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
16
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
17
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
18
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
19
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
20
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?

कार्यारंभ आदेशाअभावी काठी बंधार्‍याचा निधी परतला

By admin | Updated: May 27, 2014 00:22 IST

राज्य शासनामार्फत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरुड तालुक्यातील साठवण बंधारा काठी या बंधार्‍याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

अमरावती : राज्य शासनामार्फत विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वरुड तालुक्यातील साठवण बंधारा काठी या बंधार्‍याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विहित मुदतीत कार्यारंभ आदेश न दिल्यामुळे या प्रकल्पाच्या सुमारे ३४ लाख रुपयांचा निधी परत गेला. त्यामुळे या मुद्यावर सोमवारी जल व्यवस्थापन समितीच्या सभेत सदस्य गिरीश कराळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत वरुड तालुक्यातील काठी येथे साठवण बंधारा मंजूर केला होता. या कामासाठीची निविदा प्रक्रिया ११ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूर केली होती. सुमारे ३४ लाख ५१ हजार ६0 रुपये किमतीच्या या कामाच्या निविदा प्रक्रियेची किंमत २४ लाख ७0 हजार ८८ एवढी होती. ३.५ टक्के कमी दराने असलेली ही निविदा वरील तारखेला मंजूर केल्यानंतर काठी साठवण बंधार्‍याच्या कामाची मंजूर झालेली ही फाईल सोमवारी २६ मे रोजी बाहेर काढण्यात आली.

मंजूर झालेल्या निविदा प्रक्रियेचा कार्यारंभ आदेश जिल्हा परिषद सिंचन विभागाने विहित मुदतीत न दिल्यामुळे या तलावाचे ३४ लाख रुपये शासनकडे परत गेले. त्यामुळे वरुड तालुक्याची सिंचनातील प्रगती खुंटली आहे, असा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गिरीश कराळे यांनी लावून धरला. या मुद्यावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन अध्यक्षांनी सभागृहात दिले. याशिवाय जलव्यवस्थापन समितीच्या सभेत विदर्भ सधन सिंचन विभाग कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेने आराखड्यातील विविध विकासकामे मंजूर केली आहेत. मात्र ही मंजूर कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येऊ नये, असे तोंडी आदेश राज्याच्या जलसंधारण विभागाच्या सचिवांनी दिल्यामुळे कोट्यवधी रुपयांची सिंचनाची कामे जिल्हा परिषदेत ठप्प पडली आहेत.

मात्र हा निर्णय प्रधान सचिवांनी दिला असला तरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा यावर भाष्य करण्यास तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गिरीश कराळे यांनी केली. वीज वितरण कंपनीमार्फत नवीन वीज जोडणीची जिल्हय़ात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत. अशावेळी पावसाच्या लहरीपणात कृषिपंपांचा आधार ओलितासाठी महत्त्वाचा ठरतो. परंतु कृषिपंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित असल्यामुळे शेतकरी चांगले संतप्त झाले आहेत. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले. याशिवाय ही सभा पाणी टंचाई, सिंचन अशा विविध मुद्यांवर चांगलीच गाजली.

सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सभापती महेंद्रसिंग गैलवार, मनोहर सुने, चंद्रपाल तुरकाने, सदस्य गिरीश कराळे, ज्योती आरेकर, सीईओ अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यु. जे. क्षीरसागर, पाणी पुरवठय़ाचे अभियंता श्‍वेता बॅनर्जी आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)