शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘याची देही याची डोळा, मरण मी पाहिले’; मृत्यूला स्पर्शून गेलेला प्रवास!

By admin | Updated: May 8, 2017 00:01 IST

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शांत वातावरणात अचानक किंंकाळ्या गुंजल्या...काही तरी विपरीत घडत असल्याची क्षणभर जाणीव झाली..

प्रकृती धोक्याबाहेर : धामणगावच्या माजी नगराध्यक्षांनी कथन केली ‘आपबिती’लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शांत वातावरणात अचानक किंंकाळ्या गुंजल्या...काही तरी विपरीत घडत असल्याची क्षणभर जाणीव झाली..आणि मृत्यूचा अटळ प्रवास सुरू झाल्याची पुसटशी जाणीव झाली आणि क्षणात सगळे काही धुसर होत गेले. जाग आली तोवर सगळे होत्याचे नव्हते झाले होते. मृत्युने केलेल्या पाठशिवणीत आपण कसे बरे जिंकलो..हा प्रश्न आजही पडतोेय. आपले प्राण वाचले म्हणून आनंद साजरा करावा की सहप्रवाशांचा असा करूण अंत झाल्याचा शोक करावा, काहीच कळत नाही, अशा शब्दांत धामणगावच्या माजी नगराध्यक्ष अर्चना व सतीश राऊत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. चारधाम यात्रेसाठी मोठ्या उत्साहात आणि जय्यत तयारीनिशी घराबाहेर पडताना वाटेत मृत्यू असा दबा धरून बसला असेल, याची पुसटशी कल्पनाही नव्हती. पाच दिवसांचा प्रवास सुखरूप, आनंदात पार पडला. मात्र, सहावा दिवस उगवला तो भयाण मृत्युचे सावट घेऊनच. देहरादून येथील रूग्णालयात उपचार घेणाऱ्या माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत यांना आजही या अपघातातून सहकुटूंब सुखरूप बाहेर आल्याच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. नाही म्हणायला पती आणि मुलगी सुखरूप असल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यातून जाणवते. राऊत कुटुंबिय सतीश, अर्चना व त्यांची मुलगी आर्या हे १ मे रोजी उत्तराखंडमध्ये देवदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक कृषी अधिकारी संजय पाटील यांच्यासोबत निघाले होते. त्यांचा पाच दिवसांचा प्रवास अगदी हसतखेळत झाला. केदारनाथ येथील दर्शन घ्यावे व परतीच्या प्रवासाला निघावे, असे नियोजन होते. सकाळी नाश्ता झाल्यानंतर प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये बसले. गंगोत्री ते केदारनाथ मार्गावरील टेहरीवाल जिल्ह्यातील चंगोरा गावाजवळ अकस्मात वाहन क्र. एच.आर.७९ बी.२७१८ वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच क्षणार्धात वाहन तब्बल ३०० फूट खोल दरीत पडले. तातडीने मिळाली मदत धामणगाव रेल्वे : अर्चना राऊत सांगतात, त्यावेळी आमच्या संवेदना जागृत होत्या. आम्ही सर्वजण केवळ देवाची आराधना करीत होतो. अवघ्या काही वेळात घटनास्थळी पोेलिसांचा ताफा पोहोचला. या अपघातात अर्चना राऊत यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली. त्यांचे पती सतीश, मुलगी आर्या हे देखील सुखरूप आहेत. अरूण अडसड यांची तत्परता भाजप नेते अरूण भाऊ अडसड यांना या भीषण अपघाताची माहिती मिळताच त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संपर्क साधला. लगोलग टेहरीवाल जिल्ह्याचे कलेक्टर स्वत: अपघातस्थळी रवाना झालेत. विशेषत: मुख्यमंत्री रावत यांनी स्वत: लक्ष घालून जखमींना त्वरित उपचार उपलब्ध करून दिलेत. अपघातातील जखमी माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत व राऊत कुटुंबियांची तासातासाला अडसड चौकशी करीत आहेत. मुलगी, पती सुखरूप असल्याचा आनंदअपघातानंतर रूग्णालयात नेले असता पती आणि मुलगी कशी असेल, याची रूखरूख होती. त्या दोघांचे चेहरे बघितल्याशिवाय पाण्याचा घोटही घशाखाली उतरला नाही. मनात वाईट विचारांचे काहूर माजले होते. मात्र, आर्या आणि सतीश राऊत सुखरूप असल्याचे पाहून अतिव आनंद झाला. मात्र, दुसऱ्याच क्षणी जावई संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडली आणि मोठा धक्का बसला, असे अर्चना राऊत यांनी सांगितले.