शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

अनुदानित शाळांतील शिपाई पदे हद्दपार; विद्यार्थिसंख्येनुसार मिळेल भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST

अमरावती : अनुदानित शाळांमध्ये शिपाई पदे कायमचे बंद होणार आहेत. आता विद्यार्थिसंख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार आहे. ...

अमरावती : अनुदानित शाळांमध्ये शिपाई पदे कायमचे बंद होणार आहेत. आता विद्यार्थिसंख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू केला जाणार आहे. त्यामुळे नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे संपुष्टात येतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व खासगी, अनुदानित, अंशत: अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारित आकृतिबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थिसंख्येनुसार प्रतिशाळा शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात ११ डिसेंबर २०२० रोजी शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. प्रत्येक शाळेत किती विद्यार्थिसंख्या असल्यास किती शिपाई (आकृतिबंध अपेक्षित चतुर्थश्रेणी पदे) लागू राहतील, त्यांची संख्या, त्यांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत, ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल, याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये सद्यस्थितीत एकही चतुर्थश्रेणी पद कार्यरत नाही, तेथे आकृतिबंध लागू असणार आहे. जेथे कर्मचारी कार्यरत आहे, तिथे रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता लागू राहणार आहे. या नव्या आकृतिबंधामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे दिसून येत आहे.

-----------------

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा - ४७३

एकूण पदे - ९५०

सध्या नोकरीवर असलेले शिपाई- ६३५

शिपायाच्या रिक्त जागा- ३१५

---------------------

शिक्षक परिषदेचा विरोध

१) प्रतिशाळा महिना शिपाई भत्ता लागू राहणार, असे सांगून विभागाने देण्यात येणारा भत्ता प्रतिशिपाई लागू असेल की नाही, याबाबत स्पष्ट केले नाही. सोबतच जेथे एक हजार विद्यार्थी आहेत, तेथे केवळ पाच शिपाई कसे सेवा पुरवू शकतील, यावर शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

२) प्रशासकीय कामांसाठी बाहेर फिरणे, शाळेची साफसफाई करणे, प्रयोगशाळेतील गोष्टींकडे लक्ष देणे, शिवाय शाळा दोन सत्रांत असल्यास केवळ तीन शिपाई कुठे आणि कसे काम पाहतील. असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी संघटनांनी शाळा बंद ठेवून निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.

३) अध्ययन-अध्यापन साहाय्यात आधार असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी मानधनावर काम करायला लागले, तर चांगले कर्मचारी मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, कमीत कमी चार शिपाई शाळेत असताना, ती संख्या दोनवर आणल्याने अतिरिक्त शिपाई वाढणार आहेत. थोडक्यात नवीन भरती पुढे १० वर्षे होणार नाही.

---------

कोट

आधीच शिपाई, सफाई कामांसाठी माणसे मिळत नाहीत. भरती बंद केल्यास शाळा व्यवस्थापनावर परिणाम होईल. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमावे लागतील. कामे कशी करावी, स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. मोठी समस्या उदभवणार आहे.

- शरद अग्रवाल, धामणगाव रेल्वे

--------------

कोट

अनेक वर्षांपासून शिपाई पदभरती केलेली नाही. त्यामुळे शाळा कशी चालवायची, हा गंभीर प्रश्न आहे. तोकड्या मानधनावर सर्व कामे कोण करणार, याचा शासनाने विचार करावा. शासनाची नवी नियमावली शाळा चालविणे कठीण होणार आहे.

- मधुकर अभ्यंकर, अमरावती.

कोट

शासनादेशाप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. चतुर्थश्रेणी पदाची भरती आता होणार नाही, हे आदेशात स्पष्ट झाले आहे. शिपाईसाठी शाळांंना विद्यार्थिसंख्येनुसार भत्ता मिळेल.

- तेजराव काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अमरावती.