शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

दर्यापूर तहसीलमधील जेल कक्षात समस्यांचा खच

By admin | Updated: May 7, 2016 00:43 IST

तहसीलमधील जेल कक्षाचा पूर्वी कैदी ठेवण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु आता स्वतंत्र विभाग निर्माण झाल्यामुळे या जेल कक्षाचा वापर निवडणुकीचे साहित्य

प्रशासनाचे दुर्लक्ष : निवडणुकीचे साहित्य ठेवण्याकरिता होतो वापरशुभम बायस्कार दर्यापूरतहसीलमधील जेल कक्षाचा पूर्वी कैदी ठेवण्यासाठी वापर करण्यात येत होता. परंतु आता स्वतंत्र विभाग निर्माण झाल्यामुळे या जेल कक्षाचा वापर निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली.ज्येष्ठ कक्षात मोठ्या प्रमाणात समस्या असून याकडे तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. परिसरात निवडणुकीचे साहित्य, पुस्तके, साक्षर भारतचे कॅलेंडर तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्याद्वारे देण्यात येणारे मतदान केंद्राध्यक्ष व मतदार अधिकारी याची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर मोठ्या प्रमाणावर धूळ साचलेली होती व हे साहित्य अस्ताव्यस्त खाली पडलेले होते. सर्व टाकावू वस्तू जेलमध्ये कोंबून भरण्यात आलेल्या होत्या. तालुक्यातील लोकांच्या कामकाजाची माहिती ठेवणारे तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड, फाईली या साऱ्या सहित्यांवर धुळीचा थर चढला असून त्याकडे कुणी ढुंकूनही पहायला तयार नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कित्येक वर्षांपासून वापरात नसलेल्या साहित्यांचा तहसील कार्यालयामार्फत लिलाव न झाल्याने त्या या कक्षात कोंबून ठेवलेल्या आहे. त्यामुळे साहित्यावर प्रचंड प्रमाणात झाडांच्या पाला पाचोळ्याचा थर बसलेला होता. तसेच जेल कक्षात महापुरुषांचे फोटोसुद्धा फुटक्या अवस्थेत धूळ खात आहेत. तसेच तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना आतमध्ये पार्किंगची व्यवस्था असूनसुध्दा या जेलरुमजवळ अज्ञात कर्मचाऱ्याने आपले वाहन उभे करून ठेवले आहे. परंतु त्या बाबीवर संबंधित अधिकाऱ्यांचे कक्ष नसल्यामुळे हा परिसर दुर्लक्षितच आहे, असे दिसून आले आहे. जेलजवळ प्रसाधनगृहाचीसुध्दा पाहणी केली आहे. या प्रसाधनगृहाचीसुध्दा दैनावस्था झाल्याचे आढळून आले आहे.ट्रेझरी कार्यालयाजवळील पोलीस चौकी बंदचजेल कक्षाजवळून अगदी लागून ट्रेजरी कार्यालय असल्यामुळे इथे दोन स्वतंत्र २४ तास सेवेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करुन ठेवण्यात आल्यांची माहितह देण्यात आली होती. परंतु जेव्हा प्रत्यक्ष या पोलीस रुमची पाहणी करण्यात आली तेव्हा रुम बंद आढळून आली जर सूर्याच्याच उजेडात हा प्रकार या चौकीत होत असेल तर २४ तास ही चौकी उघडी असेलच का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.