शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आरोपाने व्यथित सीईओंचे सभेतून बहिर्गमन

By admin | Updated: July 30, 2016 00:06 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले.

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेतील प्रकारअमरावती : भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी. सीईओंचा संताप बघून जि.प.पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना जाहीर माफी मागून सभागृहात परत आणले. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेचे प्रकरण काही महिन्यांपासून स्थायी समितीत गाजत आहे. जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार सीईओंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालून अधिनस्थ अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्यात. मात्र, यातून कोणतेच तथ्य निघाले नसल्याचे मत सदस्य रवींद्र मुंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या अनियमिततेकडे प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीईओंचे लक्ष नाही. ते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंदे यांनी केला. यामुळे सीईओंचा पारा चढला आणि मुदेंच्या वक्तव्यावर प्रखर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘साहेब, उभ्या आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही आणि करू दिला नाही. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करा. माझ्या कार्यप्रणालीवर संशय असेल तर अविश्वास आणा’. तत्पूर्वी उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी सभागृहाच्यावतीने जाहीर माफी मागितली. सीईओंचा संताप पाहून काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे अभिजित ढेपे यांनी सीईओंची बाहेर जाऊन समजूत काढली व मनधरणी करून त्यांना सभागृहात परत आणले. परिणामी सभेतील इतर मुद्यांवरील चर्चा मागे पडले. या घटनेनंतर अर्ध्या तासांत ही सभा गुंडाळण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात सभेतील हा विषय बराच काळ चघळला गेला. (प्रतिनिधी)प्रशासकीय सेवेत आलो तेव्हापासून नव्हे त्याआधीपासून कधीही भष्ट्राचार केला नाही आणि कुणालाही पाठबळ दिले नाही. ती माझी संस्कृती नाही. तरीही ज्यांना कुणाला असे वाटत असेल त्यांनी असले आरोप सिद्ध करावेत आणि मगच बोलावे. असे आरोप कदापीही खपवून घेणार नाही.सुनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमग्रारोहयोचा लाभ मिळवून देण्याकरिता नांदगाव पं.स.मध्ये पैसे मागितले जातात. या प्रकरणाची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही. त्यामुळे अपहार करणाऱ्यांना सीईओ खतपाणी घालतात का, असा सवाल मी उपस्थित केला. सीईओंवर भष्ट्राचाराचा आरोप केला नाही. -रविंद्र मुंदे जिल्हा परिषद सदस्य