शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरोपाने व्यथित सीईओंचे सभेतून बहिर्गमन

By admin | Updated: July 30, 2016 00:06 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले.

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभेतील प्रकारअमरावती : भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केल्याने व्यथित झालेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी चक्क सभेतून बहिर्गमन केले. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत हा प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी. सीईओंचा संताप बघून जि.प.पदाधिकारी व सदस्यांनी त्यांना जाहीर माफी मागून सभागृहात परत आणले. नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततेचे प्रकरण काही महिन्यांपासून स्थायी समितीत गाजत आहे. जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार सीईओंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालून अधिनस्थ अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्यात. मात्र, यातून कोणतेच तथ्य निघाले नसल्याचे मत सदस्य रवींद्र मुंदे यांनी यावेळी व्यक्त केले. या अनियमिततेकडे प्रशासनाचे प्रमुख म्हणून सीईओंचे लक्ष नाही. ते भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुंदे यांनी केला. यामुळे सीईओंचा पारा चढला आणि मुदेंच्या वक्तव्यावर प्रखर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘साहेब, उभ्या आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही आणि करू दिला नाही. हिंमत असेल तर आरोप सिद्ध करा. माझ्या कार्यप्रणालीवर संशय असेल तर अविश्वास आणा’. तत्पूर्वी उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी सभागृहाच्यावतीने जाहीर माफी मागितली. सीईओंचा संताप पाहून काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, प्रताप अभ्यंकर, गिरीश कराळे, सतीश हाडोळे अभिजित ढेपे यांनी सीईओंची बाहेर जाऊन समजूत काढली व मनधरणी करून त्यांना सभागृहात परत आणले. परिणामी सभेतील इतर मुद्यांवरील चर्चा मागे पडले. या घटनेनंतर अर्ध्या तासांत ही सभा गुंडाळण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेच्या आवारात सभेतील हा विषय बराच काळ चघळला गेला. (प्रतिनिधी)प्रशासकीय सेवेत आलो तेव्हापासून नव्हे त्याआधीपासून कधीही भष्ट्राचार केला नाही आणि कुणालाही पाठबळ दिले नाही. ती माझी संस्कृती नाही. तरीही ज्यांना कुणाला असे वाटत असेल त्यांनी असले आरोप सिद्ध करावेत आणि मगच बोलावे. असे आरोप कदापीही खपवून घेणार नाही.सुनील पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमग्रारोहयोचा लाभ मिळवून देण्याकरिता नांदगाव पं.स.मध्ये पैसे मागितले जातात. या प्रकरणाची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही. त्यामुळे अपहार करणाऱ्यांना सीईओ खतपाणी घालतात का, असा सवाल मी उपस्थित केला. सीईओंवर भष्ट्राचाराचा आरोप केला नाही. -रविंद्र मुंदे जिल्हा परिषद सदस्य