शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

तीनशे शेतकऱ्यांच्या शेत बांधांचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:07 IST

खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमोबाईल कंपनीचा कहर : पावसाळ्यात शेतीचा रस्ता केला बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खरीप हंगामात शेतीच्या कामाला सुरुवात झाली असताना तब्बल तीनशे शेतकऱ्यांचे बांधच एका मोबाईल कंपनीच्या कंत्राटदाराने खोदले आहे. त्यामुळे शेतात पेरणी कशी करावी, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.जुना धामनगाव ते चांदूर रेल्वे या मार्गावर एका मोबाईल कंपनीचे केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. दररोज शेतीचे बांध खोदले जात असून, हे केबल टाकताना कोणत्याही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याने शेतकऱ्यांत आक्रोश निर्माण झाला आहे. पेरणीसाठी शेती तयार केल्यानंतर ऐनवेळी शेतीचे बांध खोदल्याने शेतकरी नाराज झाले आहे.रात्री शेतबांधात खोदकामज्या शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर खोदकाम करण्यास नकार दिला, त्या शेतकऱ्यांचे बांध रात्रीला केबल टाकण्यासाठी खोदले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. रात्रीला खनन करू करता येत नसताना महसूल विभागाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे.बांधकाम विभाग झोपेतकोणत्याही मोबाईल कंपनीचा केबल टाकताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या जागेवरची ना -हरकत परवानगी गरजेची असते. तब्बल तीनशे शेतकऱ्यांच्या शेतावरील बांध खोदला जात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे काय, यासंदर्भात हा विभाग उत्तर देत नाही. कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता बोलण्यास तयार नाही.कंत्राटदाराची दमदाटीआपल्या शेतीचे बांध खोदण्यासाठी आमची परवानगी नसताना पेरणीच्या काळात का खोदले जात आहे, अशी विचारणा अनेक शेतकऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला विचारले असता शेतकऱ्यांची दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार काही शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. आमचीच शेती अन् आम्हालाच जीवे मारण्याची धमकी संबंधित कंत्राटदाराकडून मिळत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.पावसाळ्याचे दिवस त्यांत शेतीची पेरणीची वेळ असताना बांधच केबलसाठी फोडले जात आहे. सदर कंत्राटदारावर त्वरित फौजदारी कारवाई करावी.- श्रीकांत रोंघे,शेतकरी, विरूळ रोंघे