शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

कधी गाव मुक्काम, कधी झाडाखालीच सभा

By admin | Updated: June 4, 2017 00:05 IST

बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना,...

शेतकऱ्याशी थेट संवाद : पालकमंत्र्यांच्या शिवार सभेची ७७ गावात उपलब्धीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्याचा जागीच निपटारा करणे, हे या संकल्पनेला अभिप्रेत, आदी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबींना जिल्ह्यात मूर्तरूप मिळाले आहे. जिल्ह्याचे पालक या नात्याने ना.प्रवीण पोटे यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला. ही या अभियानाची उपलब्धी होय.भर दुपारी झाडाखाली, कधी खाटेवर, तर कधी सतरंजीवर बैठक घेऊन शेतकरी व मंत्र्यामधला संवाद झाला. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एक जागृत व जबाबदार मंत्री म्हणून पालकमंत्र्यांची धडपड त्यांच्या दौऱ्यात अनुभवास आली. सर्वसामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनीधी व शासनाकडून खूप काही अपेक्षा आहेत. आपल्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे, या वाक्यापासून ना.पोटे संवाद साधण्यास सुरुवात करतात. काही लवाजमा नाही. व्यासपीठ, मंडप आदी काही नाही. सावलीचा आधार घेत सतरंजीवर बैठक मारलेले पालकमंत्री व उपस्थितांमध्ये मग सुरक्षित अंतराची बाधा राहत नाही व भीड चेपून थेट संवाद होतो. हेच या अभियानाच्या यशस्वीतेचे गमक असल्याचे दिसून आले. राज्यात गेल्या ७० वर्षांत अशा प्रकारचा संवाद प्रथमच होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलतांना सांगीतले.व जिल्ह्याचा पालक म्हणून हे आपले कर्तव्य आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शाश्र्वत शेतीव्दारे शेतकरी समृद्धीचा वसा शासनाने घेतला असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली. मागील तीन वर्षांत राज्य शासनाने समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून धाडसाने निर्णय घेतले आहे. अंमलबजावणीमध्ये जर प्रशासनातील एखादा अधिकारी आपली जबाबदारी नीट पाळत नसेल त्याला वठणीवर आनन्यासाठी आपण समर्थ आहोत. कुठलाच संकोच न बाळगता आपणाकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. कधी प्रेमाने तर कधी रागावून. मात्र, थेट संवाद संकल्पनेला कुठेही बाधा न येऊ देता पालकमंत्र्यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांमध्ये थेट शिवार संवाद संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. नागरिकदेखील प्रथमच असे अभियान अनुभवत असल्याने गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.८.५० लाख क्विंटल तुरीची शासकीय खरेदी जिल्ह्यात यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाले. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्याच्या उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्यांवर तूर खरेदी केली. सध्या ८.५० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. या केंद्रांना पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व तूर शासन खरेदी करणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधीच एवढी तूर खरेदी केली नव्हती, असे पालकमंत्र्यांनी सांगताच शेतकऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.स्थानिक कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा रोषगावपातळीवरील प्रशासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांविरुद्ध नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली. दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही गावांत हे कर्मचारी केव्हाही धाऊन येतात, याची ग्वाहीदेखील नागरिकांनी दिली.