शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कधी गाव मुक्काम, कधी झाडाखालीच सभा

By admin | Updated: June 4, 2017 00:05 IST

बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना,...

शेतकऱ्याशी थेट संवाद : पालकमंत्र्यांच्या शिवार सभेची ७७ गावात उपलब्धीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बळीराज्याच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अंतर्गत शिवार संवाद सभा, ही पंडित दिनदयाल उपाध्याय यांची संकल्पना, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्याचा जागीच निपटारा करणे, हे या संकल्पनेला अभिप्रेत, आदी स्वप्नवत वाटणाऱ्या बाबींना जिल्ह्यात मूर्तरूप मिळाले आहे. जिल्ह्याचे पालक या नात्याने ना.प्रवीण पोटे यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला. ही या अभियानाची उपलब्धी होय.भर दुपारी झाडाखाली, कधी खाटेवर, तर कधी सतरंजीवर बैठक घेऊन शेतकरी व मंत्र्यामधला संवाद झाला. श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी एक जागृत व जबाबदार मंत्री म्हणून पालकमंत्र्यांची धडपड त्यांच्या दौऱ्यात अनुभवास आली. सर्वसामान्य नागरिकांच्या लोकप्रतिनीधी व शासनाकडून खूप काही अपेक्षा आहेत. आपल्या समस्या, अडचणी समजून घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे पाठविले आहे, या वाक्यापासून ना.पोटे संवाद साधण्यास सुरुवात करतात. काही लवाजमा नाही. व्यासपीठ, मंडप आदी काही नाही. सावलीचा आधार घेत सतरंजीवर बैठक मारलेले पालकमंत्री व उपस्थितांमध्ये मग सुरक्षित अंतराची बाधा राहत नाही व भीड चेपून थेट संवाद होतो. हेच या अभियानाच्या यशस्वीतेचे गमक असल्याचे दिसून आले. राज्यात गेल्या ७० वर्षांत अशा प्रकारचा संवाद प्रथमच होत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलतांना सांगीतले.व जिल्ह्याचा पालक म्हणून हे आपले कर्तव्य आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शाश्र्वत शेतीव्दारे शेतकरी समृद्धीचा वसा शासनाने घेतला असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली. मागील तीन वर्षांत राज्य शासनाने समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून धाडसाने निर्णय घेतले आहे. अंमलबजावणीमध्ये जर प्रशासनातील एखादा अधिकारी आपली जबाबदारी नीट पाळत नसेल त्याला वठणीवर आनन्यासाठी आपण समर्थ आहोत. कुठलाच संकोच न बाळगता आपणाकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. कधी प्रेमाने तर कधी रागावून. मात्र, थेट संवाद संकल्पनेला कुठेही बाधा न येऊ देता पालकमंत्र्यांनी आठवडाभरात तब्बल ७७ गावांमध्ये थेट शिवार संवाद संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. नागरिकदेखील प्रथमच असे अभियान अनुभवत असल्याने गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.८.५० लाख क्विंटल तुरीची शासकीय खरेदी जिल्ह्यात यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाले. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्याच्या उत्पादकतेच्या तुलनेत ५० टक्क्यांवर तूर खरेदी केली. सध्या ८.५० लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. या केंद्रांना पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व तूर शासन खरेदी करणार आहे. यापूर्वीच्या सरकारने कधीच एवढी तूर खरेदी केली नव्हती, असे पालकमंत्र्यांनी सांगताच शेतकऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.स्थानिक कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा रोषगावपातळीवरील प्रशासनाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांविरुद्ध नागरिकांनी गाऱ्हाणी मांडली. दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर पालकमंत्र्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही गावांत हे कर्मचारी केव्हाही धाऊन येतात, याची ग्वाहीदेखील नागरिकांनी दिली.