कारवाई : पथकातील कर्मचारी-दुकानदारांमध्ये वादबडनेरा : स्थानिक नव्या वस्तीतील आठवडी बाजार परिसरात महानगर पालिकेने बुधवारी अतिक्रमण मोहीम राबविली. अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकानदारांचे साहित्य ताब्यात घेतल्यामुळे पथकातील कर्मचारी व दुकानदारांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. आठवडी बाजार परिसरात रस्त्यावर थाटलेली दुकाने तसेच मौलाना आझाद मार्केटमधील दुकानदारांनी उभारलेले तात्पुरते शेड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाद्वारे काढण्यात आले. पथकाने दुकानदारांची वजन मापे व काही साहित्य ताब्यात घेतल्याने पथकातील कर्मचारी व दुकानदारांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चुकीच्या पध्दतीने कारवाईअमरावती : अतिक्रमण हटविण्याची मोहीम आटोपल्यानंतर नगरसेविका कांचन ग्रेसपुंजे, चंदूमल बिल्दाणी, बळीराम ग्रेसपुंजे, किशोर गणवानी, टेकचंद केसवानी, राजेश गुल्हाणी, श्रीचंद धामाई, अशोक वरणानी यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी महापालिका उपायुक्त चंदन पाटील यांची भेट घेतली. दुकानाच्या आवारातून साहित्य जप्त केल्याची कारवाई चुकीच्या पध्दतीने होत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे होते. आठवडी बाजार परिसरात कारवाईच्या वेळी नागरिक, व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. (शहर प्रतिनिधी)
बडनेऱ्यात अतिक्रमण हटविले
By admin | Updated: August 27, 2015 00:22 IST