शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रशिक्षणाच्या नावे २ कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:28 IST

‘ट्रायबल’मध्ये घोटाळा; अधिकारी, कर्मचारी गोत्यात येण्याची चिन्हे

- गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या सातपैकी पाच प्रकल्पांत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावे १ कोटी ९५ लाख, ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला असून दोन दिवसांत संबंधित संस्थेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.औरंगाबाद येथील श्रीमंत महाराज महादेवराव सिंधीयाजी फाऊंडेशन, जाणता राजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि परभणी जिल्ह्यातील लोहारा येथील क्रांतिज्योती प्रमिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेने आदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणात सन २०१२ ते २०१६ या कालावधीत अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.नाशिक येथील आयुक्त, तसेच अमरावतीचे अपर आयुक्त यांनी फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना अगोदरच प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत. मात्र, औरंगाबाद व किनवट येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहाराचे प्रकरण पोलिसांत देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.धारणी येथील सहायक प्रकल्प अधिकारी किशोर पटेल, पुसद येथील आदिवासी विकास निरीक्षक ए. एस. इंगळे, तर कळमनुरी प्रकल्पातील वरिष्ठ लिपीक के. बी. भोरपे यांची नियुक्ती प्राधिकृत अधिकारी म्हणून केली असून फौजदारी दाखल करण्यासाठी यांना पुढाकार घ्यावा लागेल.कौशल्य विकास आयुक्तांचे पत्रही बनावटआदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण ही योजना कागदोपत्री राबविली. मात्र, प्रशिक्षणाथींंना दिलेले प्रमाणपत्रही बनावट होते, हे चौकशीतून समोर आले आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि त्यावरील स्वाक्षरी बोगस असल्याचे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आयुक्तांनी सांगितले. प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अवधी ३ डिसेंबर १९३१ असे दर्शविण्यात आले आहे. ब्रिटिशपूर्व काळ यात नमूद आहे. इतकेच नव्हे तर भारताची राजमुद्रेचा वापर प्रमाणपत्रावर केल्याचे स्पष्ट झाले.