शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आठ जणांना दृष्टी अन् १२ लोकांना मिळाली किडनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:57 IST

गत दोन वर्षात जिल्ह्यात ब्रेनडेड घोषित झालेल्या सात जणांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून ३१ रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आणले आहेत. आठ जणांना दृष्टी मिळाली, तर १२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही अशक्यप्राय बाब अवयवदान, नेत्रदान, रक्तदान चळवळीमुळे शक्य झाली, हे विशेष.

ठळक मुद्दे३१ रुग्णांच्या जीवनात बहरला आनंद : नेत्रदान, अवयवदान, रक्तदान चळवळ ठरली लाभदायक

सुनील चौरसिया ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत दोन वर्षात जिल्ह्यात ब्रेनडेड घोषित झालेल्या सात जणांनी वेगवेगळ्या उपक्रमांतून ३१ रुग्णांच्या जीवनात आनंदाचे क्षण परत आणले आहेत. आठ जणांना दृष्टी मिळाली, तर १२ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही अशक्यप्राय बाब अवयवदान, नेत्रदान, रक्तदान चळवळीमुळे शक्य झाली, हे विशेष.गत वर्षभरात जिल्ह्यात ८० जणांनी अवयवदान केले. १२१३ नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प घेतला आहे. सामाजिक जाणिवेतून नेत्रदान, अवयवदान, रक्तदान चळवळीत हिरीरीने सहभागी होण्याची वेळ आता आली आहे. जिल्ह्यात मार्च २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत ब्रेनडेड झालेल्या सात जणांचे अवयवदान करण्यात आले आहे. त्यांच्या अवयवांच्या बळावर विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या ठिकाणी ३१ रुग्णांना जीवनदान देण्याची किमया साधली गेली आहे. यात डॉक्टरांची भूमिका मोलाची ठरली.ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीच्या शोकमग्न स्थितीत त्यांना सावरून घेऊन मृताच्या अवयवाचे दान डॉक्टरांनी मागितले. त्यांच्या समुपदेशनाचा योग्य परिणाम होऊन अशी परवानगी त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली. ही सामाजिक चळवळ वेगाने पुढे जात असल्याचे वास्तव आहे.ब्रेनडेड झालेल्या अशा व्यक्तींचे वैद्यकीय तपासणीअंती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोन हृदय, सात यकृत, १२ किडनी, फुफ्फुस, आठ नेत्र अशी अवयवदानाची यादी आहे. एवढेच नव्हे तर एका रुग्णाची त्वचादेखील दान करण्यात आली. अशाप्रकारे त्वचा प्रत्यारोपणाच्या अनोख्या विक्रमाची नोंद अमरावतीकरांच्या भरीव योगदानातून नोंदविली गेली. हे अवयव नागपूर, अहमदाबाद यासह अन्य जिल्ह्यात प्रत्यारोपित करण्यात आले.८० जणांनी केला अवयवदानाचा संकल्पस्थानिक विदर्भ विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ८० जणांनी अवयवदानाचा संकल्प घेतला. त्यांना डोनेट कार्ड प्रदान करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून अवयवदान करण्याचे आवाहन सीएस श्यामसुंदर निकम, सतीश वडनेरकर, वननाथ सरोदे यांनी केले आहे.हे अवयव करता येतील दानब्रेनडेड झालेल्या अथवा मृत पावलेल्या व्यक्तीचे किडनी, फुफ्फुस, यकृत, हृदय, डोळे, त्वचा अवदान देता येऊ शकतात. तथापि, मृत्यूपश्चात चार तासांच्या आत अवयवदानाची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे, अन्यथा ते अवयव कामी येणार नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.