शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महापालिकेत आठ महिने जकात!

By admin | Updated: March 27, 2015 00:05 IST

महापालिकांमधील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

अमरावती : महापालिकांमधील स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एलबीटीला पर्याय म्हणून आॅगस्ट-२०१५ पासून ‘व्हॅट’मध्ये वृध्दीचा निर्णय विचाराधीन आहे. मात्र, ‘व्हॅट’ला असलेला कडवा विरोध लक्षात घेता शासन आॅगस्ट २०१५ ते मार्च २०१६ या आठ महिन्यांच्या काळात जकात कर लागू करुन महापालिकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.भाजपने निवडणुकांच्या काळात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना एलबीटी रद्द झाल्याची घोषणा करून व्यापाऱ्यांना खुश केले. मात्र, आॅगस्टपासून एलबीटीला नवीन पर्याय शोधला जाईल, असे महापालिकांना आश्वासित केले. परंतु व्यापाऱ्यांना एलबीटीऐवजी इतर कोणताही कर नको आहे. यामुळे एलबीटीला पर्याय शोधण्याच्या शासनाच्या भूमिकेमुळे आपली चक्क फसवणूक झाली ही भावना राज्यभरातील व्यापाऱ्यांमध्ये रुढ झाली आहे. एलबीटीच्या मुद्याला अनुसरुन व्यापाऱ्यांनी राज्य शासनासोबत दोन हात करण्याची तयारीदेखील सुरु केली आहे. पुणे येथे ‘फॅम’चा मेळावा आयोजित करुन एलबीटीबाबत फसवणूक झाल्याची चर्चादेखील करण्यात आली. राज्य शासनाने दिलेला शब्द पाळावा, ही मागणी व्यापाऱ्यांची आहे. परंतु एलबीटी रद्द केल्यानंतर पर्यायी व्यवस्था कोणती? यासंदर्भात शासन विचारमंथन करीत आहे. केंद्र शासनाची ‘जीएसटी’ ही एकमेव करप्रणाली १ एप्रिल २०१६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी मुंबई महापालिकेत जकात कर पूर्ववत सुरु ठेवण्यावर शासनाचे एकमत झाले आहे. मात्र, उर्वरित २५ महापालिकांमध्ये ‘एलबीटी’च्या बदल्यात जादा व्हॅट आकारणी करण्याची शासनाची तयारी आहे.