शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननाने आठ एकर शेती पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदाराने खोलाड नदीपात्रासह शेतीचे अधिक उत्खनन केल्याने दोन शेतकऱ्यांच्या जमिनी ...

धामणगाव रेल्वे : समृद्धी महामार्गाकरिता लागणाऱ्या मुरुमाकरिता कंत्राटदाराने खोलाड नदीपात्रासह शेतीचे अधिक उत्खनन केल्याने दोन शेतकऱ्यांच्या जमिनी खचत आहेत. यादरम्यान साडेआठ एकर शेती पाण्याखाली आल्याने सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा येथील प्रताप बाळासाहेब राऊत व अजय राऊत यांचे याच शिवारात शेत आहे. समृद्धी महामार्गावर लागणाऱ्या मुरमाकरिता नजीकचे एक शेत घेऊन उत्खनन केले. विशेष म्हणजे सध्या पावसाने या खड्ड्यात पाणी भरले आहे. त्यामुळे प्रताप राऊत यांच्या साडेआठ एकर शेतीची जमीन पाण्यामुळे खचणे सुरू झाले आहे. दररोज या शेताचा काही भाग ओलाव्यामुळे खचत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

नियम बसविले धाब्यावर

एखाद्या ठिकाणी उत्खननाची खोली ही सहा मीटरपेक्षा अधिक नसावी, अशी अट आहे. परंतु या कंत्राटदाराने तब्बल १२ ते १५ मीटर खोल उत्खनन केले. विशेष म्हणजे, मंजूर क्षेत्राचे सीमांकन करून फलक फलक लावलेला नाही. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक इमारती किंवा मंदिर, नद्या, नाले, जलाशय, दफनभूमी येथून ५० मीटरच्या आत खोदकाम करणार नाही व हानी पोहचणार नाही, असे नियम असताना, खोलाड नदीचे उत्खनन करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह या कंत्राटदाराने बदलविला आहे.

सामूहिक जलसमाधीशिवाय नाही पर्याय

शेतकरी प्रताप राऊत यांनी समृद्धी महामार्ग अंतर्गत रस्ते विकास महामंडळाला अनेक वेळा निवेदन दिले. तालुका प्रशासनापुढे कैफीयत मांडली. मात्र, अद्यापही प्रशासनाचे या गंभीर मागणीकडे दुर्लक्ष आहे. प्रताप राऊत यांची शेती या खड्ड्यालगत असल्याने दररोज ओलाव्यामुळे शेती खचणे सुरू झाले आहे. शेत नापेर ठेवून उपाशी राहण्यापेक्षा संबंधित खड्ड्यात जलसमाधी घेतल्याशिवाय पर्याय नाही, असे निवेदन या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले आहे.

------

आतापर्यंत प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, साधी शेतीची पाहणी करण्यासाठी कुणीही आले नाही. समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराच्या अरेरावीपणामुळे हा प्रकार घडला आहे. त्वरित लक्ष देऊन आर्थिक मदत न मिळाल्यास याच खड्ड्यात जलसमाधी घेणार आहे.

- प्रताप राऊत, आष्टा