शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

---------------------------------------------------------------------------------------------- रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे तिवसा (अमरावती) : ...

----------------------------------------------------------------------------------------------

रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे

तिवसा (अमरावती) : विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी माता रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. १५९४ वर्षांपासून ही चालत आलेली सर्वांत जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली असली तरी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली. त्यात कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरच्या पालखीचा समावेश आहे.

रविवारी एसटी बसने ४० वारकऱ्यांसह ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेती पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे, असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्रीविठ्ठलाला घातले.

आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला रविवारी पालकमंत्री ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व पालखीचे पूजन झाले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा ताल यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशी वृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बॉक्स

मंदिरात पादुकांचे पूजन करून माता रुक्मिणीच्या ओटीसह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गावात पालखी काढण्यात आली. अंबिकादेवीच्या मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते, अशी आख्यायिका असलेल्या त्या अंबिकामातेच्या मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांचे पहिलं रिंगणसुद्धा झाले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर रुक्मिणीच्या पादुकांसह माता अंबिकादेवीच्या पादुकासुद्धा घेऊन गावाच्या वेशीवर टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी व गावातील लोकांनी पालखीला निरोप दिला.

कोट

कोरोनाचे नियम पाळून पालखी निघाली आहे. या पालखीसोबत प्रशासनाच्यावतीने मी असणार आहे. सोबत रुग्णवहिका, डॉक्टरांची टीम आहे. प्रशासन वारकऱ्यांच्या सेवेत आहे.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा