शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

---------------------------------------------------------------------------------------------- रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे तिवसा (अमरावती) : ...

----------------------------------------------------------------------------------------------

रुक्मिणी मातेची पालखी शिवशाहीने पंढरीला रवाना, महामारी टळो, वारी घडो - पालकमंत्र्यांनी घातले विठ्ठलाला साकडे

तिवसा (अमरावती) : विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी माता रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. १५९४ वर्षांपासून ही चालत आलेली सर्वांत जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली असली तरी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली. त्यात कौंडण्यपूर येथील रुक्मिणीच्या माहेरच्या पालखीचा समावेश आहे.

रविवारी एसटी बसने ४० वारकऱ्यांसह ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. यावेळी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेती पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे, असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्रीविठ्ठलाला घातले.

आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला रविवारी पालकमंत्री ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते श्रीक्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व पालखीचे पूजन झाले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाचा ताल यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशी वृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बाल कल्याण सभापती पूजा आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बॉक्स

मंदिरात पादुकांचे पूजन करून माता रुक्मिणीच्या ओटीसह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून गावात पालखी काढण्यात आली. अंबिकादेवीच्या मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते, अशी आख्यायिका असलेल्या त्या अंबिकामातेच्या मंदिराजवळ पालखीचा पहिला विसावा झाला. त्या ठिकाणी वारकऱ्यांचे पहिलं रिंगणसुद्धा झाले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी रिंगण सोहळ्यात फुगडी खेळून वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर रुक्मिणीच्या पादुकांसह माता अंबिकादेवीच्या पादुकासुद्धा घेऊन गावाच्या वेशीवर टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी व गावातील लोकांनी पालखीला निरोप दिला.

कोट

कोरोनाचे नियम पाळून पालखी निघाली आहे. या पालखीसोबत प्रशासनाच्यावतीने मी असणार आहे. सोबत रुग्णवहिका, डॉक्टरांची टीम आहे. प्रशासन वारकऱ्यांच्या सेवेत आहे.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा