शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टपाल खात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे नोकरी हुकली

By admin | Updated: July 14, 2017 00:43 IST

टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर

युवकाचे नुकसान : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर दोन दिवस उशिरा प्राप्त झाल्याने थेट मुलाखतीस पोहोचू न शकल्याने सदर तरूणाची "आॅर्डनन्स फॅक्टरी"त नोकरीची संधी हुकली. संबंधित डाक विभागाचा गलथान कारभार व चुकीचे नियोजन यास जबाबदार असल्याचा आरोप त्या युवकाने केला आहे. त्याला न्याय कोण देणार,हा प्रश्न पडला आहे. चेतन गंगाधर बोबडे, सदर युवकाचे नाव असून त्याने मार्च २०१७ मध्ये आॅर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे नोकरीसाठी अ‍ॅप्लिकेशन केले होते. त्याची २४ जून रोजी मुलाखत असल्याचे पत्र सदर युवकाला पाठविले होते. परंतु वलगाव येथील पोस्टमनने ते पत्र २९ जून २०१७ रोजी दुपारी २.१० वाजता प्राप्त झाले. पण या नोकरीसाठी इंटर्व्ह्य त्याच दिवशी सकाळी ९ वाजता असल्याने तो पुणे येथे पोहचू शकला नाही. याला सदर डाक विभागाचे चुकीचे नियोजन व पोस्टमनचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त चेतन बोबडे यांनी "लोकमत"शी बोलताना केला आहे. याची चौकशी या युवकाने केली असता सदर मुलाखत पत्र २४ जून रोजीच वलगाव पोस्टाला प्राप्त झाले होते. परंतु मुलाखतपत्र येथील संबंधित पोस्टमन युवकाला वेळेच्या आता दिले नाही. यासंदर्भाची तक्रार चेतन याने वलगावच्या पोस्टमास्टरकडे लेखी स्वरूपात केली आहे. संबंधितांवर कारवार्इंची अपेक्षा केली आहे. तसेच यासंदर्भाची तक्रार त्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडेसुध्दा केली आहे. डाक विभागाचा कारभार विश्वासू मानला जातो. पण काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे डाक विभागाला खाली पाहण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रवर डाक अधीक्षकांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.