शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

टपाल खात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे नोकरी हुकली

By admin | Updated: July 14, 2017 00:43 IST

टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर

युवकाचे नुकसान : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका युवकावर नोकरी गमाविण्याची वेळ आली. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचे कॉल लेटर दोन दिवस उशिरा प्राप्त झाल्याने थेट मुलाखतीस पोहोचू न शकल्याने सदर तरूणाची "आॅर्डनन्स फॅक्टरी"त नोकरीची संधी हुकली. संबंधित डाक विभागाचा गलथान कारभार व चुकीचे नियोजन यास जबाबदार असल्याचा आरोप त्या युवकाने केला आहे. त्याला न्याय कोण देणार,हा प्रश्न पडला आहे. चेतन गंगाधर बोबडे, सदर युवकाचे नाव असून त्याने मार्च २०१७ मध्ये आॅर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे नोकरीसाठी अ‍ॅप्लिकेशन केले होते. त्याची २४ जून रोजी मुलाखत असल्याचे पत्र सदर युवकाला पाठविले होते. परंतु वलगाव येथील पोस्टमनने ते पत्र २९ जून २०१७ रोजी दुपारी २.१० वाजता प्राप्त झाले. पण या नोकरीसाठी इंटर्व्ह्य त्याच दिवशी सकाळी ९ वाजता असल्याने तो पुणे येथे पोहचू शकला नाही. याला सदर डाक विभागाचे चुकीचे नियोजन व पोस्टमनचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप अन्यायग्रस्त चेतन बोबडे यांनी "लोकमत"शी बोलताना केला आहे. याची चौकशी या युवकाने केली असता सदर मुलाखत पत्र २४ जून रोजीच वलगाव पोस्टाला प्राप्त झाले होते. परंतु मुलाखतपत्र येथील संबंधित पोस्टमन युवकाला वेळेच्या आता दिले नाही. यासंदर्भाची तक्रार चेतन याने वलगावच्या पोस्टमास्टरकडे लेखी स्वरूपात केली आहे. संबंधितांवर कारवार्इंची अपेक्षा केली आहे. तसेच यासंदर्भाची तक्रार त्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडेसुध्दा केली आहे. डाक विभागाचा कारभार विश्वासू मानला जातो. पण काही बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे डाक विभागाला खाली पाहण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रवर डाक अधीक्षकांशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.