शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कडक लॉकडाऊनमुळे गल्लीबोळांतही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

कोरोनाची धास्ती; नागरिक स्वत:हून घेऊ लागले काळजी अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ९ मेपासून कडक ...

कोरोनाची धास्ती; नागरिक स्वत:हून घेऊ लागले काळजी

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ९ मेपासून कडक लॉकडाऊन लागू केला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून सुरक्षित राहता यावे, याकरिता पूर्वीपेक्षा नागरिक आता अधिक दक्षता घेताना दिसत आहेत. सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. सकाळी ११ पर्यंत कॉलनी, वस्तीत नागरिक दिसत असले तरी दुपारी १२ पासून मात्र अनेक कुटुंबे घरातच राहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेल्या कडक लॉकडाऊन व त्याकरिता लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचाही बराच प्रभाव लोकवस्तीत दिसू लागला आहे. सकाळी माॅर्निग वॉक करताना नागरिक बाहेर दिसत असतात, तर तुरळक प्रमाणात घराबाहेर कामानिमित जात असले तरी दुपारी मात्र सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गतवेळच्या कोरोना लाटेपेक्षा आताची कोरोना लाट भयावह आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या व होत असलेल्या मृत्यूची संख्या पाहता, नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी नियमित मास्कचा वापर, नियिमत हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे आदी त्रिसूत्रीचे पालन नागरिक करताना दिसत आहेत. असेच काटेकोर पालन प्रत्येक नागरिकाने स्वत:हून केल्यास नक्कीच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखला जाऊ शकतो.

कोट

कोरोनाचा वाढता संसर्ग व यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या व मृत्यूचे आकडे ही बाब लक्षात घेता, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास यापासून प्रत्येक जण सुरक्षित राहू शकतो.

- डी.एस. गावंडे, नागरिक

कोट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेला कडक लॉकडाऊन हा जनतेच्या हिताचाच आहे. कोरोनाचा संसर्गापासून दूर राहण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपल्या घरीच राहून सुरक्षित राहणे बरे.

- मधुकर फरदळे, नागरिक