शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

नियोजन शून्य, शेतकºयांचा भरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:43 IST

पीकविम्याच्या मुद्यावर प्रसंगी दिल्लीवारी करेन, असे वक्तव्य या राज्याचे मुख्यमंत्री हे करीत असले......

ठळक मुद्देपायाभूत सुविधांचा अभाव : पीकविम्यासाठी आॅनलाईनचा अट्टाहास का ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीकविम्याच्या मुद्यावर प्रसंगी दिल्लीवारी करेन, असे वक्तव्य या राज्याचे मुख्यमंत्री हे करीत असले तरी बँका मात्र शेतकºयांच्या पीकविम्याची 'कटकट' दूर सारण्यासाठी शेतकºयांना बाहेरचा रस्ता दाखवीत आहे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जातीने लक्ष घालणे महत्त्वपूर्ण झाले आहे.दुबार पेरणी व्यर्थ गेलेली असताना आता पीकविम्याचे कवच अत्यंत गरजेचे आहे. ज्या कारणांमुळे शेतकºयांचा अल्प प्रतिसाद पीकविमा योजनेला जिल्ह्यात लाभला, त्यापैकी बँकांची असहकाराची व अपमास्पद वागणूक हे प्रमुख कारण ठरले आहे. चार लक्ष १५ हजार शेतकरी अधिकाषांचे खातेदार असताना ३१ जुलै या प्रथम डेडलाईनपर्यंत केवळ ८१ हजार शेतकºयांनीच या योजनेत सहभाग नोंदविला.कम्प्लेंट बॉक्स ठेवाअधिकोष व्यवस्थापक आणि कर्मचारी शेतकºयांना या नाजूक समयी सहकार्य करतात की कसे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेत दर्शनी भागात सीलबंद तक्रार पेटी ठेवण्याचे आदेश द्यावे. नीडरपणे तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रत्येक शाखेत फलके लावून केले जावे. जिल्हाधिकाºयांनी नेमलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनीच ती तक्रारपेटी उघडावी. बँकांमध्ये शेतकºयांना कशी वागणूक मिळते, याचे चित्रच जिल्हाधिकाºयांसमोर स्पष्ट होईल. किती शेतकºयांना केवळ बँकेच्या असहकार्यामुळे पीकविम्यापासून वंचित रहावे लागले, हेही कळू शकेल.पासबुकची झेरॉक्स नसल्यास विमा नाहीसेंट्रल बँक आॅफ इंडिया ही लीड बँक आहे. या बँकेची वागणूक नमुन्यादाखल येथे नोंदविता येईल. कमी-अधिक ग्रामीण भागातील बहुतांश बँकांसंबंधी या तक्रारी प्राप्त होत आहेत. सेंट्रल बँकेच्या भातकुली शाखेने शेतकºयांच्या पीक विम्याची 'कटकट' कमी करण्यासाठी शेतकºयांना पीक विमा न काढताच अधिकोषातून हकलण्याचा अजब फंडा वापरला आहे. अधिकोषात जाताच तेथील शिपाई पीकविमा कसा लाभकारक नाही, या विषयी शेतकºयांशी बोलतो. तरीही शेतकºयाने पीक विम्यासाठी आग्रह धरल्यास सेंट्रल बँकेच्या भातकुली खात्याच्या पासबुकची झेरॉक्स मागितली जाते. ज्यांना अधिकोषाने पासबूक दिले आहे, त्यांच्याकडे झेरॉक्स असू शकते; तथापि ज्यांना पासबूक दिलेच नाही त्यांनी झेरॉक्स द्यायची कुठून? परंतु शेतकºयांना मदत करण्याऐवजी हाच मुद्दा पीकविमा नाकारण्यासाठी वापरला जातो. झेरॉक्स नसेल तर पीकविमा काढणार नाही, असे सांगून शेतकºयांना शाखेबाहेरचा रस्ता दाखविला जातो. मुद्दा असा उपस्थित होतो की, की कृषी खात्याने सक्षम ठरविलेल्या अधिकाºयांनी प्रमाणित करून दिलेला अर्ज महत्त्वाचा ठरू नये आणि कुठल्याही नियमांत न बसणाºया पासबुकच्या झेरॉक्ससाठी विमा नाकारायचा, ही कार्यप्रणाली लोकशाहीतील म्हणायची की तालीबानी? त्याच शाखेत खाते असल्याने संबंधित शेतकºयाचा खाते क्रमांक बँकेकडेच उपलब्ध आहे. खात्याच्या आवश्यक त्या नोंदीही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यासाठी पासबुकच्या झेरॉक्सची अशी अट म्हणजे अधिकोषाच्या निर्णायक व्यक्तींनी रचलेले शेतकरीविरोधी षड्यंत्र नव्हे काय? अशा अधिकाºयांना शासन नको काय?पीक विम्याला ५ आॅगष्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता फक्त आॅफलाईन अर्जच बँकेमार्फत स्विकारण्यात येणार आहे. शेतकºयांना अडचण आल्यास नजीकच्या कृषी कार्यलयाशी संपर्क करावा. अधिकारी बँकेत येऊन सहकार्य करतील.- अनिल खर्चान,उपसंचालक, कृषीपीकविम्याला मुदतवाढ द्या - यशोमती ठाकूरअमरावती : शेतकरी हितासाठी शासनाने पीकविम्याला मुदतवाढ द्यावी, याबाबतचे मागणी वजा निवेदन तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिले. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकºयांना पीकविमा काढताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. यामुळे पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी ही मागणी त्यांनी लावून धरली. यावेळी जयंत देशमुख, गजानन राठोड, वहिदा युसूफ शहा, वैभव वानखडे, नरेंद्र विघ्ने, अंकुश बनसोड, सागर राऊत आदी उपस्थित होते.-तर केंद्रचालकांवर फौजदारी : जिल्हाधिकारी‘आपले सरकार’ या पोर्टलवर शेतकºयांच्या कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज मोफत भरावेत, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र जर कोणी केंद्रचालक यासाठी शेतकºयांना पैस्याची मागणी करीत असल्यास तक्रार करावी, त्या केंद्र चालकाविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असे बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले. जिल्ह्यात एक एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी व एक लाख ६५ हजार चालू कर्जदार शेतकरी असे एकूण तीन लाख ३२ हजार शेतकरी दीड लाखाची कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत.