शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

By admin | Updated: July 12, 2017 00:04 IST

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला.

पिकांवर परिणाम : तब्बल आठव्यांदा जून महिना राहिला कोरडालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला. मागील वर्षीचा हंगाम वगळता त्यापूर्वीचे दोन्ही हंगाम मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे उद्धवस्त झाले आहेत. ६७ वर्षांचा आढावा घेतला असता मान्सूनच्या आगमनात वैविध्य आढळून येते. आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा उशिरा आगमन झाले आहे. सन २००२ मध्ये २७ जुलैला मान्सून बरसला होता. ही मान्सूनची सर्वात उशिराची हजेरी मानली जाते. तब्बल आठव्यांदा जून महिना कोरडा राहिला, हे विशेष. जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. यापूर्वीच्या ६० वर्षांचा आढावा घेतला असता सन १९९० साली ५ जून रोजीच मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनने यावर्षी सर्वात लवकर हजेरी लावलेली होती. यावर्षी जून महिन्यात मान्सून सर्वसामान्य राहिल व वर्षभरात सरासरी इतका पाऊस पडेल, असे भाकित हवामान विभागाने केले होते. प्रत्यक्षात जून महिन्यात जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला.जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ ४९ टक्के पाऊस पडला आहे. यंदा मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त पाच जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसूवर होती. मात्र असताना पुनर्वसू लागून आठवडा उलटल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यापूर्वी सन १९५१, १९५५, १९६५, १९७२, १९८७, २००९, २०१४ व २०१७ मध्ये जून महिना कोरडा गेला. आतापर्यंत ६७ वर्षांत आठव्यांदा जून महिना कोरडा गेला आहे. याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर झाला. यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त ४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपासाठी प्रस्तावित ७ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.सन १९९० मध्ये लवकर,२००२ सर्वाधिक उशिराजिल्ह्यासह विदर्भात मागील ६७ वर्षांत मान्सूनच्या आगमनाचा आढावा घेतला असता ५ जून १९९० रोजी सर्वात लवकर तर २००२ मध्ये २७ जुलै रोजी झालेले मान्सुनचे आगमन हे सर्वाधिक उशिरा ठरले आहे. तब्बल ११ वर्षे मान्सूनचे जुलै महिन्यात आगमन झाले तर ४० वर्षांत ५ ते ३० जून या कालावधीत मान्सूनचे आगमन झाले आहे.पीक, पेरणी, बियाण्यांचे नियोजन आवश्यकपावसाळा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाल्यास सोयाबीनची पेरणी करता येते.सोयाबीन-तूर आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. मूग व उडिदाची पेरणी शक्यतोवर टाळावी.पेरणी करताना साधारणपणे २५ ते ३० टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा व रासायनिक खतांच्या वापरामध्ये २५ टक्के कपात करावी.२५ जुलै पर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पावसाळा जुलैच्या चवथ्या आठवड्यात सुरू झाल्यास शक्यतोवर कपाशीची पेरणी करू नये. करावयाची असल्यास देशी कपाशीचे सुधारित वाण पेरावे. बियाणे २० ते ३० टक्के अधिक वापरावे. कपाशीच्या ओळींची संख्या कमी करून मधात एक किंवा दोन तुरीच्या ओळी घ्याव्यात.