शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

६७ वर्षांत १२ वेळा मान्सूनची हुलकावणी

By admin | Updated: July 12, 2017 00:04 IST

यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला.

पिकांवर परिणाम : तब्बल आठव्यांदा जून महिना राहिला कोरडालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असली तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. जिल्ह्यात येऊन ठेपलेला मान्सून प्रतिकूल हवामानामुळे माघारला. मागील वर्षीचा हंगाम वगळता त्यापूर्वीचे दोन्ही हंगाम मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे उद्धवस्त झाले आहेत. ६७ वर्षांचा आढावा घेतला असता मान्सूनच्या आगमनात वैविध्य आढळून येते. आतापर्यंत १२ वेळा मान्सूनचे नियोजित वेळेपेक्षा उशिरा आगमन झाले आहे. सन २००२ मध्ये २७ जुलैला मान्सून बरसला होता. ही मान्सूनची सर्वात उशिराची हजेरी मानली जाते. तब्बल आठव्यांदा जून महिना कोरडा राहिला, हे विशेष. जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. यापूर्वीच्या ६० वर्षांचा आढावा घेतला असता सन १९९० साली ५ जून रोजीच मान्सूनचे आगमन झाले होते. मान्सूनने यावर्षी सर्वात लवकर हजेरी लावलेली होती. यावर्षी जून महिन्यात मान्सून सर्वसामान्य राहिल व वर्षभरात सरासरी इतका पाऊस पडेल, असे भाकित हवामान विभागाने केले होते. प्रत्यक्षात जून महिन्यात जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला.जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ ४९ टक्के पाऊस पडला आहे. यंदा मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडेच गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त पाच जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसूवर होती. मात्र असताना पुनर्वसू लागून आठवडा उलटल्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यापूर्वी सन १९५१, १९५५, १९६५, १९७२, १९८७, २००९, २०१४ व २०१७ मध्ये जून महिना कोरडा गेला. आतापर्यंत ६७ वर्षांत आठव्यांदा जून महिना कोरडा गेला आहे. याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर झाला. यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त ४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. खरिपासाठी प्रस्तावित ७ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तीन लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत.सन १९९० मध्ये लवकर,२००२ सर्वाधिक उशिराजिल्ह्यासह विदर्भात मागील ६७ वर्षांत मान्सूनच्या आगमनाचा आढावा घेतला असता ५ जून १९९० रोजी सर्वात लवकर तर २००२ मध्ये २७ जुलै रोजी झालेले मान्सुनचे आगमन हे सर्वाधिक उशिरा ठरले आहे. तब्बल ११ वर्षे मान्सूनचे जुलै महिन्यात आगमन झाले तर ४० वर्षांत ५ ते ३० जून या कालावधीत मान्सूनचे आगमन झाले आहे.पीक, पेरणी, बियाण्यांचे नियोजन आवश्यकपावसाळा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू झाल्यास सोयाबीनची पेरणी करता येते.सोयाबीन-तूर आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे. मूग व उडिदाची पेरणी शक्यतोवर टाळावी.पेरणी करताना साधारणपणे २५ ते ३० टक्के बियाण्यांचा अधिक वापर करावा व रासायनिक खतांच्या वापरामध्ये २५ टक्के कपात करावी.२५ जुलै पर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पावसाळा जुलैच्या चवथ्या आठवड्यात सुरू झाल्यास शक्यतोवर कपाशीची पेरणी करू नये. करावयाची असल्यास देशी कपाशीचे सुधारित वाण पेरावे. बियाणे २० ते ३० टक्के अधिक वापरावे. कपाशीच्या ओळींची संख्या कमी करून मधात एक किंवा दोन तुरीच्या ओळी घ्याव्यात.