शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अवकाळीने ४९ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2015 00:00 IST

यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके ...

अमरावती : यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिके बाधित झाल्याचा संयुक्त सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला. मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याविषयी सकारात्मकता दाखविल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीमागे नापिकीचे सत्र सुरूच आहे. मागील खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने उद्ध्वस्त झाला. त्यानंतरचा रबी हंगाम अवकाळी पाऊस, गारपीट व परतीच्या पावसाने बाधित झाला. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी माघारला. पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याने शासनाने टंचाई घोषित केली. खरीप बाधित झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आशा रबी पिकावर होती. मात्र २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४९६ गावांमधील १५ हजार ३५३ शेतकऱ्यांचे ४२ हजार ७६६ हेक्टर मधील पिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६१२१ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झाले. फळपिकात ९८२६ हेक्टरमध्ये अंशत: व १४ हेक्टरमध्ये ५० टक्क््यांवर नुकसान झाले. इतर पिकांचे १२४७ हेक्टरमध्ये अंशत: ९१ हेक्टरमध्ये पूर्णत: बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान गहू व हरभरा पिकाचे झाले आहे. शासनाला वादळामुळे बाधित क्षेत्राचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडूनही २ हजार कोटींची मदत मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.