शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने ४९ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2015 00:00 IST

यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके ...

अमरावती : यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिके बाधित झाल्याचा संयुक्त सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला. मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याविषयी सकारात्मकता दाखविल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीमागे नापिकीचे सत्र सुरूच आहे. मागील खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने उद्ध्वस्त झाला. त्यानंतरचा रबी हंगाम अवकाळी पाऊस, गारपीट व परतीच्या पावसाने बाधित झाला. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी माघारला. पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याने शासनाने टंचाई घोषित केली. खरीप बाधित झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आशा रबी पिकावर होती. मात्र २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४९६ गावांमधील १५ हजार ३५३ शेतकऱ्यांचे ४२ हजार ७६६ हेक्टर मधील पिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६१२१ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झाले. फळपिकात ९८२६ हेक्टरमध्ये अंशत: व १४ हेक्टरमध्ये ५० टक्क््यांवर नुकसान झाले. इतर पिकांचे १२४७ हेक्टरमध्ये अंशत: ९१ हेक्टरमध्ये पूर्णत: बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान गहू व हरभरा पिकाचे झाले आहे. शासनाला वादळामुळे बाधित क्षेत्राचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडूनही २ हजार कोटींची मदत मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.