शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने ४९ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 27, 2015 00:00 IST

यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके ...

अमरावती : यंदाच्या रबी हंगामात २८ फेब्रुवारी व १ मार्चला वादळासह अकाली पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ४८ हजार ८८८ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिके बाधित झाल्याचा संयुक्त सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केला. मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याविषयी सकारात्मकता दाखविल्याने दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाठीमागे नापिकीचे सत्र सुरूच आहे. मागील खरीप हंगाम सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसाने उद्ध्वस्त झाला. त्यानंतरचा रबी हंगाम अवकाळी पाऊस, गारपीट व परतीच्या पावसाने बाधित झाला. यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी माघारला. पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याने शासनाने टंचाई घोषित केली. खरीप बाधित झाल्याने शेतकऱ्यांची सर्व आशा रबी पिकावर होती. मात्र २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे ४९६ गावांमधील १५ हजार ३५३ शेतकऱ्यांचे ४२ हजार ७६६ हेक्टर मधील पिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६१२१ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झाले. फळपिकात ९८२६ हेक्टरमध्ये अंशत: व १४ हेक्टरमध्ये ५० टक्क््यांवर नुकसान झाले. इतर पिकांचे १२४७ हेक्टरमध्ये अंशत: ९१ हेक्टरमध्ये पूर्णत: बाधित झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान गहू व हरभरा पिकाचे झाले आहे. शासनाला वादळामुळे बाधित क्षेत्राचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाला केंद्राकडूनही २ हजार कोटींची मदत मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.