शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

‘लॉकडाऊन’मुळे रोजी गेली; रोटी देणार’शिवभोजन’थाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

जिल्ह्यात २३ केंद्र ;२ हजार ५०० जणांना लाभ अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहे. ...

जिल्ह्यात २३ केंद्र ;२ हजार ५०० जणांना लाभ

अमरावती : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहे. याच काळात गरीब, गरजूंची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था विविध केंद्रांवर केली आहे. जिल्ह्यात २३ केंद्रांवर या दररोज २,५०० शिवभोजन थाळी मोफत उपक्रमाची अंमलबजावणी १५ एप्रिलपासून सुरू झाली आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन कार्यक्रम आखला आहे. बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजतापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. दरम्यान, हे करतानाच दुर्बल घटकाच्या अडचणी रोखण्यासाठी त्यांना विविध पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. गरिबांची जेवणासाठीची समस्या थांबविण्यासाठी शिवभोजन योजनेतून प्रत्येक केंद्रावर मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. गतवर्षी २६ जानेवारीपासून ही योजना आघाडी सरकारने सुरू केली. त्यानुसार प्रत्यक्षात शिवभोजन केंद्र सुरू झाले. या केंद्रात ठरवून दिलेल्या वेळेत येणाऱ्या नागरिकांना सर्व केंद्र मिळून २,५०० थाळीचा लाभ दिला जात आहे. यापूर्वी लाभार्थ्यांकडून ५ रुपये घेतले जात होते. मात्र, १५ एप्रिलपासून मोफत सुविधेच्या लाभाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

बॉक्स

महा अन्नपूर्णा ॲपवर माहिती संकलन

या योजनेंतर्गत मिळणाऱ्या थाळीत ३०० ग्रॅमच्या दोन चपाती, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण दिले जात आहे. प्रत्येक केंद्राला गरजू लोकांनाच थाळी देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा फोटो केंद्र चालकांकडून काढला जातो. तो फोटो अन्नपूर्णा ॲपवर केंद्रचालकाकडून डाउनलोड केले जातात. त्यावरून प्रत्येक केंद्रात दररोज किती लोकांनी लाभ घेतला याची माहिती संकलित होते. अशी माहिती केंद्राच्या संचालक वसंत कोैसकीया यांनी दिली.

बॉक्स

जिल्ह्यात असे आहेत शिवभोजन केंद्र

अमरावती ५, दर्यापूर २, अचलपूर २, नांदगाव खंडेश्र्वर २, तिवसा १, धारणी १, चांदूर बाजार १, चांदूर रेल्वे १, भातकुली १, अंजनगाव सुर्जी १, धामणगाव रेल्वे २, चिखलदरा १, वरूड १ आणि मोर्शी १ असे एकूण २३ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. २३ केंद्र, दररोज २५०० जणांना लाभ दिला जात आहे.

कोट

बॉक्स

थाळीचा लाभ घेणारे

कोट

शिवभोजन थाळी मुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळाला आहे. हातमजूर बेरोजगार व निराधारांना गेल्या वर्षभरापासून शिवभोजन थाळी वरदान ठरले असून थाळी व्दारे दिले जाणाऱ्या भोजनाचा दर्जा हि समाधान कारक आहे.

आकाश सोळंके

कोट

शिवभोजन थाळी फक्त गोरगरिबांसाठीच आहे असे नव्हे, तर मध्यमवर्गीयदेखील याचा आस्वाद घेतात. विशेष म्हणजे थाळीचा दर्जा आजवर टिकून आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी लोकप्रिय ठरत आहे.

- अतुल चौधरी,

संचालक, शिवभोज केंद्र

कोट

शिवभोजन योजनेअंतर्गत थाळीचा लाभ मोफत मिळणार असल्याने गोरगरीब नागरिकांची थोडीफार सोय झाली आहे. मिनी लॉकडाऊन दरम्यान शिवभोजन केंद्र व लाभार्थी संख्या वाढविल्या त्याचा फायदा अनेकांना मिळू शकेल.

- उषा भोसले,

बॉक्स

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र : २३

दररोज किती जण लाभ घेतात : २५००