शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘केम’ प्रकल्पाची खोदणार पाळेमुळे

By admin | Updated: April 16, 2017 00:02 IST

शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पन्नाचे स्रोत वाढावेत,

पालकमंत्री : वीरेंद्र जगतापांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार चौकशीअमरावती : शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पन्नाचे स्रोत वाढावेत, यासाठी समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) २००९ पासून जिल्ह्यात कार्यान्वित आहे. मात्र शेतकऱ्यांनाच या प्रकल्पाचा लाभ झाला नाही, अशा तक्रारी सातत्याने असल्याने या प्रकल्पाच्या अपयशाची पाळेमुळे खोदण्यात येतील. यासाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रकल्पाची चौकशी करेल, अशी घोषणा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शनिवारी खरीप हंगामपूर्व आढावा सभा आयोजित केली होती. यामध्ये उपस्थित आमदारांनी या प्रकल्पाचा उद्देश व उपलब्धी यावर प्रश्नचिन्ह उभे केले. यावर पालकमंत्र्यांनी प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांची विचारणा केली. मात्र या महत्त्वाच्या बैठकीत चौधरी अनुपस्थित होते. ते नागपूरला गेले असल्याने त्यांच्याऐवजी अन्य प्रतिनिधी आले होते. यावर ना. पोटे यांनी खडेबोल सुनावले व या प्रकल्पाच्या चौकशीची घोषणा केली. बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी याविषयीची माहिती दिली. या समितीमध्ये आ. अनिल बोंडे यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून अहवाल सादर करेल. अहवालात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ना. पोटे यांनी सांगितले. या प्रकल्पाची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपत आहे. मात्र शासनाला प्रस्ताव पाठवून मुदतवाढ दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.‘त्या’ व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये कपाशीचे दोन लाख १० हजार हेक्टर, सोयाबीन दोन लाख ७० हजार हेक्टर व तुरीचे एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्र राहणार आहे. यावर्षी कपाशीचे क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ होत आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावर्षी १.४१ लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ६५ हजार क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे. उर्वरित शेतकरी घरगुती स्वरूपातील बियाणे वापरणार आहे. यंदाच्या हंगामात बियाण्यांची कुठलीही टंचाई नाही. बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये व बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊ नये, यासाठी तालुका व जिल्हास्तर पथके ‘वॉच’ ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नावाआड शासकीय तूर खरेदी केंद्रात तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहे. साध्या वेशातील पोलीस निगराणी ठेवून आहेत. काही व्यापाऱ्यांना शोधण्यात यश आले. दोन ते तीन दिवसांत त्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ना. प्रवीण पोटे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. अनिल बोंडे, आ. रमेश बुंदेले, प्रभारी जिल्हाधिकारी के. आर. परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या अनुदानातून कर्जकपात करू नयेशेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई व गारपीट नुकसानीचा निधी मिळत आहे. या अनुदानातून बँकांद्वारा कर्जकपात करण्यात येत असल्याची तक्रार उपस्थित आमदारांनी बैठकीत केली. या अनुदानातून कुठलीच कर्जकपात करू नये, असे ना. पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांना निक्षूण सांगितले.पालकमंत्री म्हणालेपंतप्रधान पीक विमा योजना प्रत्येक गावात राबविणार, शेतकऱ्यांनी सात-बाऱ्यावर पीक पेऱ्याची त्वरित नोंद करावी व आधार नोंदणी करावी.स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी गावागावात जागृती करण्यात येईल. २०२४ पर्यंत शेती पिकांची पेरणी ते कापणीचे कामे एमआरईजीएसद्वारे होणार. प्रत्येक शेतकरी व शेतमजुराच्या हाताला १७९ दिवस काम.बाजार समितीमधील तुरीच्या आवक नोंदी रजिष्टर ताब्यात घेऊन नोंदीत तफावत आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार.२०२४ पर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलास शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत देणार. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा होऊन समृद्ध झाला पाहिजे यासाठी प्रयत्न.मृद आरोग्य अभियानमध्ये ७०,६७० मृदा नमूने तपासणी व दोन लाख ३७ हजार ६५४ मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले.खरीप हंगामाकरिता १.४१ लाख क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली. यामध्ये १.२१ लक्ष क्विंटल सोयाबीन व बीटीचे १०.२५ लक्ष पाकिटांचा समावेश आहे. मागील वर्षी १२९५.४३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ही ७४ टक्केवारी आहे. यंदा १९४१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक आहे.सूक्ष्म सिंचन कार्यक्रमात १२६०.९९ लाख रुपयांचे अनुदान तुषार व ठिबक संचाकरिता शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.शासकीय तूर खरेदीला आठ दिवस मुदतवाढ जिल्ह्यातील १० तालुक्यांच्या मुख्यालयी शासकीय तूर खरेदी केंद्रे ही १५ एप्रिलपासून बंद होणार आहे. मात्र या केंद्रांना आठ दिवस मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडील तुरीचा शेवटचा दाना असेपर्यंत खरेदी करू, असे पालकमंत्री म्हणाले. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यात बैठकखरीप हंगाम व शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या सर्व विभागाची दर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात बैठक घेण्याचे निर्देश ना.पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संबंधित आमदार ओरिएंटेड, अशी ही आढावा बैठक राहील. आपण स्वत: या बैठकांचे पदसिद्ध अध्यक्ष आहो, असे ना. पोटे यांनी सांगितले.