शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

कापसाच्या उत्पन्नात घट, यंदा भावही नाही

By admin | Updated: November 30, 2014 22:57 IST

दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या

शेतकरी अडचणीत : गतवर्षीपेक्षाही कमी भावाने खरेदीअमरावती : दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला तर जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची बोंड फुटायला तयार नाही. कपाशीच्या उत्पन्नात सरासरी ५० टक्याची घट आली असताना कापसाला मागील वर्षीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३ लाख हेक्टर तूर व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली. मात्र पावसाअभावी व बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्च अर्धाही निघाला नाही. अशा स्थितीत शेतकरी कपाशीकडे आस लावून असताना कापसाचे उत्पन्न कमी होत आहे व भावदेखील पडले आहे. यावर्षी ४०५० रुपये प्रतिक्विंटल पासून सुरुवात झालेला कापूस आला ३८०० रुपयांनी मागत आहे. हमी भावाची केवळ दोनच केंद्र सुरु आहेत. सोयाबीनप्रमाणेच कपाशीचा उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. एक फवारीसाठी हजाराच्या वर खर्च येत आहे. डीएपी १२०० रुपये बॅग आहे. मागील दोन वर्षात खतांच्या किमती दुपटीने वाढल्या. निसर्गही साथ देत नाही. काही भागात ‘कोकडा’ तर काही भागात ‘मर’ रोगाचा प्रार्दूभाव आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. व्यापारीदेखील कमी किंमतीत कापूस मागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)