शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

कापसाच्या उत्पन्नात घट, यंदा भावही नाही

By admin | Updated: November 30, 2014 22:57 IST

दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या

शेतकरी अडचणीत : गतवर्षीपेक्षाही कमी भावाने खरेदीअमरावती : दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला तर जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची बोंड फुटायला तयार नाही. कपाशीच्या उत्पन्नात सरासरी ५० टक्याची घट आली असताना कापसाला मागील वर्षीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३ लाख हेक्टर तूर व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली. मात्र पावसाअभावी व बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्च अर्धाही निघाला नाही. अशा स्थितीत शेतकरी कपाशीकडे आस लावून असताना कापसाचे उत्पन्न कमी होत आहे व भावदेखील पडले आहे. यावर्षी ४०५० रुपये प्रतिक्विंटल पासून सुरुवात झालेला कापूस आला ३८०० रुपयांनी मागत आहे. हमी भावाची केवळ दोनच केंद्र सुरु आहेत. सोयाबीनप्रमाणेच कपाशीचा उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. एक फवारीसाठी हजाराच्या वर खर्च येत आहे. डीएपी १२०० रुपये बॅग आहे. मागील दोन वर्षात खतांच्या किमती दुपटीने वाढल्या. निसर्गही साथ देत नाही. काही भागात ‘कोकडा’ तर काही भागात ‘मर’ रोगाचा प्रार्दूभाव आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. व्यापारीदेखील कमी किंमतीत कापूस मागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)