शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या उत्पन्नात घट, यंदा भावही नाही

By admin | Updated: November 30, 2014 22:57 IST

दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या

शेतकरी अडचणीत : गतवर्षीपेक्षाही कमी भावाने खरेदीअमरावती : दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीक निकृष्ट बियाणे, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे उध्वस्त झाले. किमान तूर, कपाशी तरी तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला तर जमिनीत आर्द्रता नसल्याने कपाशीची बोंड फुटायला तयार नाही. कपाशीच्या उत्पन्नात सरासरी ५० टक्याची घट आली असताना कापसाला मागील वर्षीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी ३ लाख हेक्टर तूर व २ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी केली. मात्र पावसाअभावी व बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. उत्पादन खर्च अर्धाही निघाला नाही. अशा स्थितीत शेतकरी कपाशीकडे आस लावून असताना कापसाचे उत्पन्न कमी होत आहे व भावदेखील पडले आहे. यावर्षी ४०५० रुपये प्रतिक्विंटल पासून सुरुवात झालेला कापूस आला ३८०० रुपयांनी मागत आहे. हमी भावाची केवळ दोनच केंद्र सुरु आहेत. सोयाबीनप्रमाणेच कपाशीचा उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. एक फवारीसाठी हजाराच्या वर खर्च येत आहे. डीएपी १२०० रुपये बॅग आहे. मागील दोन वर्षात खतांच्या किमती दुपटीने वाढल्या. निसर्गही साथ देत नाही. काही भागात ‘कोकडा’ तर काही भागात ‘मर’ रोगाचा प्रार्दूभाव आहे. यामुळे सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात कमी आली. व्यापारीदेखील कमी किंमतीत कापूस मागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)