अंजनगावसुर्जी : तालुक्यातील शेतकरी वर्गाचे मुख्यपीक असलेले सोयाबिन व कपाशी पावसाअभावी यंदा वितभरच वाढल्याने त्याच्या उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी पंधरा आॅगस्टच्या वेळी कमेएवढे वाढणाऱ्या कपाशीच्या डौलदार शेताचे देखणे दृष्य यंदा कुठेच पाहावयास मिळत नाही. सोयाबिनसुध्दा वाढ खुंटल्यामुळे निस्तेज झाले आहे. या परिस्थीतीने हताश शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पन्नाची आशा सोडली असून यंदाच्या पोळा सणावरही विरजण पडले आहे. कपाशी सोयाबिनवरच वर्षभराची अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी यंदा दुबार व तिबार पेरण्या केल्या. पण पावसाचे सारे गणीत यंदा विस्कटले. अकाली पावसासोबतच लहरी भारनियमन, वन्य प्राण्यांचा त्रास यामुुळे शेतकरी वर्ग पुरता निराश झाला आहे. आतापर्यंत तग धरुन असलेले व्यवहार या भीषण भविष्याच्या जीवघेणे थंडावलले असून या बाजारपेठेतही व्यापारी वर्गाला त्याचा फरक जाणवत आहे. जून व जुलै महिन्यातीलल कमी पावसाने आॅगस्ट महिन्यात तरी दमदार पावसाने हजेरी लावावी ही शेतकरी वर्गाची अपेक्षा फोल ठरली. गतवर्षीच्या तुलनेत पिछाडलेल्या पावसाने ऐन उमेदीत असलेल्या पिकाची वाढ खुंटुन गेली. तालुक्यात वादळी पावसाने आधिच संत्रा व केळीपीकाचे अतोनात नुकसान झाले. सोबतच रहस्यमय रोगामुळे संत्रागळ मोठ्या प्रमाणावर वाढली असून पानमडे व पानपिंपरी देखिल मान टाकत आहेत. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून मात्र अपेक्षीत असलेले सहकार्य मिळत नस्ल्याची तक्रार आहे. केळीबागांचे झालेले नुकसान तपासण्यासाठी कृषी वव महसूल विभागाने केलेली संयुक्त सर्वेक्षणाची घोषणा प्रत्यक्षात कुठेच दिसूून आली नाही. संयुक्त सर्वेक्षणाचा अहवालच नुकसानभरपाईसाठी आवश्यक असतो. पण या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने कुठे एकटाच तलाठी तर कुठे एकटाच कृषि सहाय्यक असे चित्र आहे. तालुक्याच्या कोकर्डा परिसरात तर शेतकऱ्यांनी सोयाबिनची आशा सोडली असून आपले शेत हरभऱ्यासाठी नांगरणी सुरु केले आहे.नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतातही उर्वरित पीक मातीत मिसळण्यात येत आहे. फवारणीसाठी आवश्यक ती वाढ नसल्याने फवारा मारण्याचे शेतातील दृष्यच दुर्मिळ झाले आहे. हादरलेल्या शेतकरी वर्गाने या परिस्थितीत शासनाने वीजेची बिले पुर्ण माफ करण्याची व शेतीकर्जाची रक्कम सुध्दा माफ करण्याची अपेक्षा केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली
By admin | Updated: August 12, 2014 23:31 IST