शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही; हायकोर्ट निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
6
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
7
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
8
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
9
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
10
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
11
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
12
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
13
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
14
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
15
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
16
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
17
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
18
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
19
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
20
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: August 12, 2014 23:31 IST

तालुक्यातील शेतकरी वर्गाचे मुख्यपीक असलेले सोयाबिन व कपाशी पावसाअभावी यंदा वितभरच वाढल्याने त्याच्या उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त घट होण्याची चिन्हे आहेत.

अंजनगावसुर्जी : तालुक्यातील शेतकरी वर्गाचे मुख्यपीक असलेले सोयाबिन व कपाशी पावसाअभावी यंदा वितभरच वाढल्याने त्याच्या उत्पन्नात अर्ध्यापेक्षा जास्त घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी पंधरा आॅगस्टच्या वेळी कमेएवढे वाढणाऱ्या कपाशीच्या डौलदार शेताचे देखणे दृष्य यंदा कुठेच पाहावयास मिळत नाही. सोयाबिनसुध्दा वाढ खुंटल्यामुळे निस्तेज झाले आहे. या परिस्थीतीने हताश शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पन्नाची आशा सोडली असून यंदाच्या पोळा सणावरही विरजण पडले आहे. कपाशी सोयाबिनवरच वर्षभराची अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी यंदा दुबार व तिबार पेरण्या केल्या. पण पावसाचे सारे गणीत यंदा विस्कटले. अकाली पावसासोबतच लहरी भारनियमन, वन्य प्राण्यांचा त्रास यामुुळे शेतकरी वर्ग पुरता निराश झाला आहे. आतापर्यंत तग धरुन असलेले व्यवहार या भीषण भविष्याच्या जीवघेणे थंडावलले असून या बाजारपेठेतही व्यापारी वर्गाला त्याचा फरक जाणवत आहे. जून व जुलै महिन्यातीलल कमी पावसाने आॅगस्ट महिन्यात तरी दमदार पावसाने हजेरी लावावी ही शेतकरी वर्गाची अपेक्षा फोल ठरली. गतवर्षीच्या तुलनेत पिछाडलेल्या पावसाने ऐन उमेदीत असलेल्या पिकाची वाढ खुंटुन गेली. तालुक्यात वादळी पावसाने आधिच संत्रा व केळीपीकाचे अतोनात नुकसान झाले. सोबतच रहस्यमय रोगामुळे संत्रागळ मोठ्या प्रमाणावर वाढली असून पानमडे व पानपिंपरी देखिल मान टाकत आहेत. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून मात्र अपेक्षीत असलेले सहकार्य मिळत नस्ल्याची तक्रार आहे. केळीबागांचे झालेले नुकसान तपासण्यासाठी कृषी वव महसूल विभागाने केलेली संयुक्त सर्वेक्षणाची घोषणा प्रत्यक्षात कुठेच दिसूून आली नाही. संयुक्त सर्वेक्षणाचा अहवालच नुकसानभरपाईसाठी आवश्यक असतो. पण या दोन्ही विभागात समन्वय नसल्याने कुठे एकटाच तलाठी तर कुठे एकटाच कृषि सहाय्यक असे चित्र आहे. तालुक्याच्या कोकर्डा परिसरात तर शेतकऱ्यांनी सोयाबिनची आशा सोडली असून आपले शेत हरभऱ्यासाठी नांगरणी सुरु केले आहे.नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतातही उर्वरित पीक मातीत मिसळण्यात येत आहे. फवारणीसाठी आवश्यक ती वाढ नसल्याने फवारा मारण्याचे शेतातील दृष्यच दुर्मिळ झाले आहे. हादरलेल्या शेतकरी वर्गाने या परिस्थितीत शासनाने वीजेची बिले पुर्ण माफ करण्याची व शेतीकर्जाची रक्कम सुध्दा माफ करण्याची अपेक्षा केली आहे. (तालुका प्रतिनिधी)