शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

८,४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:26 IST

राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे.

ठळक मुद्देसंत्राउत्पादक गारद, कोट्यवधीचे नुकसान : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वाचविण्याचे कृषिमंत्र्यांसमोर आव्हान; कृषी विभागाचा अहवाल

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे. हजारो कोटींंच्या फटक्याने येथील संत्राउत्पादक गारद झाला. त्यांना उभारी देऊन गतवैभव उभारण्याचे आव्हान कृषिमंत्र्यासमोर आहे.वरूड तालुक्यात जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरवर संत्रा पीक आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची ही बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या अधिक आहे. तथापि, यंदा या पिकाच्या अंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटल्या, बोअर कोरडे पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ दोन ते पाच टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अतिशय तापमान आणि अतिशय पाणी उपशामुळे खालावलेली भूजलपातळी यामुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तालुका कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी सहायकांकडून संत्र्याखालील क्षेत्राच्या नुकसानाच्या घेणे सुरू केले आहे. या नोंदीनुसार आतापर्यंत तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा नष्ट झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे संत्रा झाडे व पर्यायाने येथील अर्थकारण जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे.शेतकऱ्यांना द्या पर्यायी पिकेसंत्राबागा जगविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यास शेतकऱ्यांना अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी आपल्या माणसांचे प्रबोधन ते नक्कीच करू शकतील. याशिवाय तालुक्यातील पाणीपातळी स्थिर राखण्यासाठीही त्यांना नागरिक, शेतकºयांना विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्या लागणार आहेत.अवैध बोअरला आळा घालासंत्राबागा जगविण्याच्या आमिषातून शेतकऱ्यांना बोअर करण्यास उद्युक्त करणाºया यंत्रणेवर जरब बसविण्याची अपेक्षा कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. ‘ड्राय झोन’मुळे तालुक्यात खोदली जाणारी प्रत्येक बोअर अवैध आहे. तरीही ती खोदण्यासाठी शासकीय ते खासगी अशा मालिकेतील प्रत्येक जणाकडे रक्कम पोहोचून जमिनीला भोके पाडली जात आहेत.भय संपलेले नाहीसध्याचा लांबलेला पावसाळा पाहता, दिवसागणिक संत्राझाडे सुकण्याच्या प्रकार सुरूच आहे. संत्राबागांचे नुकसान १० हजार हेक्टरपुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने अद्यापही येथे पाणीटंचाईचे भय संपलेले नाही. त्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकºयांचा जीव कासाविस झाला आहे. तब्बल २७ वर्षानंतर मतदारसंघाला मिळालेले कृषिमंत्रिपद संत्रा पट्ट्याला नवजीवन मिळवून देईल, अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांची आहे. यासंबंधी उपाययोजनांसंदर्भात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मंत्रालयातील बैठकीमुळे ते उपलब्ध झाले नाहीत.अतितापमानामुळे संत्राझाडे सुकायला लागली असून, ही प्रक्रिया दिवसागणिक सुरू आहे. आतापर्यंत ८ हजार ४०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा सुकल्या आहे. याबाबत कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू असून, शासनाला नियमित माहिती पाठविली जात आहे.- उज्ज्वल आगरकर,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Waterपाणी