शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

८,४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:26 IST

राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे.

ठळक मुद्देसंत्राउत्पादक गारद, कोट्यवधीचे नुकसान : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ वाचविण्याचे कृषिमंत्र्यांसमोर आव्हान; कृषी विभागाचा अहवाल

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या समृद्ध भूभागाला बसला आहे. हजारो कोटींंच्या फटक्याने येथील संत्राउत्पादक गारद झाला. त्यांना उभारी देऊन गतवैभव उभारण्याचे आव्हान कृषिमंत्र्यासमोर आहे.वरूड तालुक्यात जिल्ह्यातून सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टरवर संत्रा पीक आहे. हजारो हातांना काम देणारी संत्र्याची ही बाजारपेठ आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून चवदार संत्र्याची निर्यात केली जाते. तालुक्यात कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग तसेच लघू मध्यम सिंचन प्रकल्पाची संख्या अधिक आहे. तथापि, यंदा या पिकाच्या अंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटल्या, बोअर कोरडे पडले. सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ दोन ते पाच टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अतिशय तापमान आणि अतिशय पाणी उपशामुळे खालावलेली भूजलपातळी यामुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. तालुका कृषी विभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी सहायकांकडून संत्र्याखालील क्षेत्राच्या नुकसानाच्या घेणे सुरू केले आहे. या नोंदीनुसार आतापर्यंत तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा नष्ट झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे संत्रा झाडे व पर्यायाने येथील अर्थकारण जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे.शेतकऱ्यांना द्या पर्यायी पिकेसंत्राबागा जगविण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्यास शेतकऱ्यांना अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध करण्यासाठी कृषिमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी आपल्या माणसांचे प्रबोधन ते नक्कीच करू शकतील. याशिवाय तालुक्यातील पाणीपातळी स्थिर राखण्यासाठीही त्यांना नागरिक, शेतकºयांना विश्वासात घेऊन उपाययोजना कराव्या लागणार आहेत.अवैध बोअरला आळा घालासंत्राबागा जगविण्याच्या आमिषातून शेतकऱ्यांना बोअर करण्यास उद्युक्त करणाºया यंत्रणेवर जरब बसविण्याची अपेक्षा कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. ‘ड्राय झोन’मुळे तालुक्यात खोदली जाणारी प्रत्येक बोअर अवैध आहे. तरीही ती खोदण्यासाठी शासकीय ते खासगी अशा मालिकेतील प्रत्येक जणाकडे रक्कम पोहोचून जमिनीला भोके पाडली जात आहेत.भय संपलेले नाहीसध्याचा लांबलेला पावसाळा पाहता, दिवसागणिक संत्राझाडे सुकण्याच्या प्रकार सुरूच आहे. संत्राबागांचे नुकसान १० हजार हेक्टरपुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने अद्यापही येथे पाणीटंचाईचे भय संपलेले नाही. त्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकºयांचा जीव कासाविस झाला आहे. तब्बल २७ वर्षानंतर मतदारसंघाला मिळालेले कृषिमंत्रिपद संत्रा पट्ट्याला नवजीवन मिळवून देईल, अशी अपेक्षा संत्रा उत्पादकांची आहे. यासंबंधी उपाययोजनांसंदर्भात कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मंत्रालयातील बैठकीमुळे ते उपलब्ध झाले नाहीत.अतितापमानामुळे संत्राझाडे सुकायला लागली असून, ही प्रक्रिया दिवसागणिक सुरू आहे. आतापर्यंत ८ हजार ४०० हेक्टर जमिनीवरील संत्राबागा सुकल्या आहे. याबाबत कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू असून, शासनाला नियमित माहिती पाठविली जात आहे.- उज्ज्वल आगरकर,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Waterपाणी