शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्राय झोन’मध्ये अडीच हजार अवैध बोअरने उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:49 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देसंत्राबागा वाचविण्याचा आटापिटा : बहुतांश निकामी, दलालांचा सुळसुळाट

संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरा जात आहे. सिंचन प्रकल्पात केवळ ५ ते १० टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील संत्राबागा वाचविण्यासाठी बेकायदा बोअर केले जात आहेत. अलीकडच्या वर्षभरात अनधिकृत बोअरची संख्या तब्बल अडीच हजारांवर पोहोचली आहे.अवैध बोअरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, महसूल विभागाचे मौन दलालांच्या घुसखोरीला हितकारी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमधून उमटली आहे. महसूल व पोलीस यंत्रणेशी असलेल्या आर्थिक संगनमतामुळे बोअरची संख्या वाढली असताना, अवैध पाणी उपशाने भूगर्भाची चाळण झाली आहे.तालुक्यात नऊ सिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पांत केवळ पाच ते दहा टक्के जलसाठा आहे, तर जुन्या बोअर कोरड्या पडल्या आहेत. केवळ संत्रा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी ४० ते ५० हजार रुपये ‘आॅन’ देऊन बोअर केले. बोअरला पाणी लागले म्हणून आनंद झाला; परंतु आठवड्यात बोअर कोरडे पडल्या. लाखो रुपयांचा चुराडा झाल्याने संत्रा जगवावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तालुक्यात अडीच हजारांपेक्षा अधिक नवीन, मात्र अवैध बोअर करण्यात आले. त्यातील केवळ २५ टक्के बोअरलाच पाणी लागले. ७५ टक्के बोअरचा खर्च पाण्यात गेला. संत्र्यासह गहू, चणा, मक्का, मिरची, पालेभाज्या आदी बागायती पिके तालुक्यात घेतली जातात. या पिकांना पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे संत्र्याला आवश्यक असलेल्या वेळेत पुरेसे पाणी मिळत नाही. तालुक्यातील भूजलपातळीत कमालीची घसरण होऊन बोअरचे पाणी ७०० ते ८०० फुटांवर गेले, तर विहिरींची पातळी ६० ते ८० फुटांवर गेली आहे. याच संधीचा फायदा घेऊन बोअर करून देणारे दलाल तालुक्यात सक्रिय झाले आहेत.महसूल विभाग बनला धृतराष्ट्रतालुक्यातील अनेक गावांतील बसथांब्यावर बोअर करून देणारे दलाल दिसून येतात. मात्र, महसूल विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यास प्रतिबोअर मलिदा पोहोचविला जात असल्याने त्यांनी या बेकायदा बोअरकडे दुर्लक्ष चालविले आहे. महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून बोअर होत असताना, केवळ पैशांच्या मोहापायी तालुक्यातील भूगर्भाची चाळण केली जात आहे.‘ड्राय झोन’मध्ये बोअर होतातच कशा?सन २०१३ पासून तालुका ड्राय झोन घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, भूगर्भाची पातळी अधिक खोल गेल्याने बोअर खोदकामावर बंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे येथील संत्राउत्पादक गरज म्हणून बोअर करीत असेल तरी महसूलने त्याकडे का कानाडोळा चालवलाय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.