शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:15 IST

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, ...

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, हे महत्त्वाचे आहे. किती पाणी प्यावे, हे त्या व्यक्तीचे वय व वजन यावर अवलंबून आहे. याशिवाय विविध आजारांतील व्यक्तींनीदेखील पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असल्याची माहिती युरोलॉजिस्टनी दिली.

मानवी आरोग्यात पाण्याला जीवन म्हटले गेले आहे. शरीराला आवश्यक घटनांपैकी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास व माहिती आपण शालेय स्तरापासून शिकत आलो आहोत. निरोगी शरीरासाठी दिवसभरात किमान दोन लिटर तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात ६० टक्के भाग पाण्याचा आहे. यामध्ये लघवी व घामाद्वारे पाणी शरीर उत्सर्जित करीत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, याकरिता पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पाणी किती प्यावे, यामध्येही अनेक मते आहेत. यामध्ये व्यक्तीचे वय व त्याचे वजनानुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराला एका दिवसात किमान दोन लिटर तरी पाणी आवश्यक असल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. विशाल बाहेकर यांनी दिली. काहींच्या मते, तहान नसली तरी थोडे-थोडे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

शरीरात लाळेची निर्मिती, चयापचय रक्ताभिसरण, शरीराचे तापमानाचे व्यवस्थापन, चयापचय प्रक्रियेदरम्यान विषारी पदार्थाचे उत्सर्जन आदी सर्व क्रियांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. मात्र, नुसतेच पाणी पित राहणेदेखील उपायकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला पुरेसे पाणी महत्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडनी स्टोन आदी विकार होतात. घामाद्वारे पाणी जास्त बाहेर पडल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डीहाड्रेशन होते. यामुळे थकवा येऊन रक्तदाबही कमी होतो. त्यामुळे दोन ते तीन तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर...

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास वारंवार लघवीला जावे लागते. त्या व्यक्तीच्या झोपेवरही व मानसिक स्वास्थ्यावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

कोणी किती पाणी प्यावे?

कोणी किती पाणी प्यावे, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. यामध्ये वयोगटासोबतच त्या व्यक्तीचे वजन किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. सामान्य परिस्थितीत दिवसभरात दोन लिटर पाणी पुरेसे आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलासाठी दीड लीटर, तरुणाईने व ज्येष्ठ व्यक्तींनी दोन ते अडीच लिटर व ज्येष्ठांनी दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोट

सामान्य परिस्थितीत प्रत्येकाने दोन लिटरपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात ५०० मिलि पाणी लघवीद्वारे बाहेर पडते. मुलांमध्ये हे प्रमाण दर तासाला ३० मिलि ऐवढे आहे. किडणीच्या स्वास्थ्यानुसार, किती पाणी बाहेर फेकते, हे देखील महत्वाचे आाहे. वयापेक्षा त्या व्यक्तीच्या वजनानुसार पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.

- डॉ. विशाल बाहेकर, एमएस (किडनी न्यूरोसर्जन)