शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:15 IST

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, ...

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, हे महत्त्वाचे आहे. किती पाणी प्यावे, हे त्या व्यक्तीचे वय व वजन यावर अवलंबून आहे. याशिवाय विविध आजारांतील व्यक्तींनीदेखील पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असल्याची माहिती युरोलॉजिस्टनी दिली.

मानवी आरोग्यात पाण्याला जीवन म्हटले गेले आहे. शरीराला आवश्यक घटनांपैकी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास व माहिती आपण शालेय स्तरापासून शिकत आलो आहोत. निरोगी शरीरासाठी दिवसभरात किमान दोन लिटर तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात ६० टक्के भाग पाण्याचा आहे. यामध्ये लघवी व घामाद्वारे पाणी शरीर उत्सर्जित करीत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, याकरिता पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पाणी किती प्यावे, यामध्येही अनेक मते आहेत. यामध्ये व्यक्तीचे वय व त्याचे वजनानुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराला एका दिवसात किमान दोन लिटर तरी पाणी आवश्यक असल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. विशाल बाहेकर यांनी दिली. काहींच्या मते, तहान नसली तरी थोडे-थोडे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

शरीरात लाळेची निर्मिती, चयापचय रक्ताभिसरण, शरीराचे तापमानाचे व्यवस्थापन, चयापचय प्रक्रियेदरम्यान विषारी पदार्थाचे उत्सर्जन आदी सर्व क्रियांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. मात्र, नुसतेच पाणी पित राहणेदेखील उपायकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला पुरेसे पाणी महत्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडनी स्टोन आदी विकार होतात. घामाद्वारे पाणी जास्त बाहेर पडल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डीहाड्रेशन होते. यामुळे थकवा येऊन रक्तदाबही कमी होतो. त्यामुळे दोन ते तीन तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर...

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास वारंवार लघवीला जावे लागते. त्या व्यक्तीच्या झोपेवरही व मानसिक स्वास्थ्यावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

कोणी किती पाणी प्यावे?

कोणी किती पाणी प्यावे, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. यामध्ये वयोगटासोबतच त्या व्यक्तीचे वजन किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. सामान्य परिस्थितीत दिवसभरात दोन लिटर पाणी पुरेसे आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलासाठी दीड लीटर, तरुणाईने व ज्येष्ठ व्यक्तींनी दोन ते अडीच लिटर व ज्येष्ठांनी दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोट

सामान्य परिस्थितीत प्रत्येकाने दोन लिटरपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात ५०० मिलि पाणी लघवीद्वारे बाहेर पडते. मुलांमध्ये हे प्रमाण दर तासाला ३० मिलि ऐवढे आहे. किडणीच्या स्वास्थ्यानुसार, किती पाणी बाहेर फेकते, हे देखील महत्वाचे आाहे. वयापेक्षा त्या व्यक्तीच्या वजनानुसार पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.

- डॉ. विशाल बाहेकर, एमएस (किडनी न्यूरोसर्जन)