शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते अपायकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:15 IST

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, ...

अमरावती : शरीरातील पाण्याचे प्रमाण हे व्यक्तीचे वय व त्यांचे वजनावर अवलंबून असते. किंबहुना किडणी किती पाणी बाहेर फेकते, हे महत्त्वाचे आहे. किती पाणी प्यावे, हे त्या व्यक्तीचे वय व वजन यावर अवलंबून आहे. याशिवाय विविध आजारांतील व्यक्तींनीदेखील पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे असल्याची माहिती युरोलॉजिस्टनी दिली.

मानवी आरोग्यात पाण्याला जीवन म्हटले गेले आहे. शरीराला आवश्यक घटनांपैकी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास व माहिती आपण शालेय स्तरापासून शिकत आलो आहोत. निरोगी शरीरासाठी दिवसभरात किमान दोन लिटर तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात ६० टक्के भाग पाण्याचा आहे. यामध्ये लघवी व घामाद्वारे पाणी शरीर उत्सर्जित करीत असते. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, याकरिता पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

पाणी किती प्यावे, यामध्येही अनेक मते आहेत. यामध्ये व्यक्तीचे वय व त्याचे वजनानुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीराला एका दिवसात किमान दोन लिटर तरी पाणी आवश्यक असल्याची माहिती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. विशाल बाहेकर यांनी दिली. काहींच्या मते, तहान नसली तरी थोडे-थोडे पाणी पिणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

शरीरात लाळेची निर्मिती, चयापचय रक्ताभिसरण, शरीराचे तापमानाचे व्यवस्थापन, चयापचय प्रक्रियेदरम्यान विषारी पदार्थाचे उत्सर्जन आदी सर्व क्रियांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. मात्र, नुसतेच पाणी पित राहणेदेखील उपायकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला पुरेसे पाणी महत्वाचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किडनी स्टोन आदी विकार होतात. घामाद्वारे पाणी जास्त बाहेर पडल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डीहाड्रेशन होते. यामुळे थकवा येऊन रक्तदाबही कमी होतो. त्यामुळे दोन ते तीन तरी पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

शरीरात पाणी जास्त झाले तर...

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिल्यास वारंवार लघवीला जावे लागते. त्या व्यक्तीच्या झोपेवरही व मानसिक स्वास्थ्यावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

कोणी किती पाणी प्यावे?

कोणी किती पाणी प्यावे, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहे. यामध्ये वयोगटासोबतच त्या व्यक्तीचे वजन किती आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. सामान्य परिस्थितीत दिवसभरात दोन लिटर पाणी पुरेसे आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलासाठी दीड लीटर, तरुणाईने व ज्येष्ठ व्यक्तींनी दोन ते अडीच लिटर व ज्येष्ठांनी दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

कोट

सामान्य परिस्थितीत प्रत्येकाने दोन लिटरपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात ५०० मिलि पाणी लघवीद्वारे बाहेर पडते. मुलांमध्ये हे प्रमाण दर तासाला ३० मिलि ऐवढे आहे. किडणीच्या स्वास्थ्यानुसार, किती पाणी बाहेर फेकते, हे देखील महत्वाचे आाहे. वयापेक्षा त्या व्यक्तीच्या वजनानुसार पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.

- डॉ. विशाल बाहेकर, एमएस (किडनी न्यूरोसर्जन)