शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वसंतराव नाईकांच्या स्वप्नातील कृषिक्रांती घडवा

By admin | Updated: July 2, 2016 00:07 IST

हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे.

कृषीदिन : प्रवीण पोटे यांचे प्रतिपादनअमरावती: हरितक्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्मदिन १ जुलै हा कृषिदिन म्हणून साजरा करत असताना त्यांच्या स्वप्नातील कृषी क्षेत्रात क्रांती घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले. ते जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व कृषी जागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, सदस्य अभिजित ढेपे, सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक अधिकारी दतात्रय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, आत्मा प्रकल्पाचे संचालक रवींद्र जाधव, डेप्युटी सीईओ जे.एन आभाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, वसंतराव नाईकांनी त्यांच्या कारकिर्दीत पंचायतराज संस्था, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार, धान्य खरेदी, संकरित बी-बियाणे यासारख्या शेतीशी निगडित उपक्रम राबवून शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला. वसंत बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाण्याचा स्त्रोत वाढण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या या कार्याची दखल घेत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शासनामार्फत शेतकरी हिताच्या अनेक नवीन योजना राबविण्यात येत आहेत. मात्र हे करताना शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना कृषी सप्ताहानिमित्त नव्हेतर त्या नियमित पोहोचविण्याची जबाबदारी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने पार पडावी, असे सांगितले. यावेळी जि.प. अध्यक्ष सतीश उईके यांनीही विचार मांडलेत. सीईओ सुनील पाटील, कृषी अधीक्षक दतात्रय मुळे यांनी प्रास्तावीक केले. संचालन क्षीप्रा मानकर, आभार आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र जाधव यांनी केले.