शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागरी सेवा पुरस्कारातून डावलला महसूल विभाग

By admin | Updated: May 9, 2016 00:14 IST

राज्य शासनाने यंदा नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्काराने गौरविले आहे

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावनाअमरावती : राज्य शासनाने यंदा नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्काराने गौरविले आहे. मात्र, या पुरस्काराच्या यादीतून महसूल विभागाला डावलल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. नागरी सेवा पुरस्कारात महसूल विभागाचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर कख्रून प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्कार सुरू केल्याबाबत अभिनंदन केले. परंतु या पुरस्काराच्या यादीत महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी करण्यात आले नसल्याने तहसीलदार, नायब तहसीलदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून वितरित करण्यात आलेल्या पुरस्काराची यादीत महसूल विभागाला मुद्दामहून डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासकीय व्यवस्थेचा कणा महसूल विभाग असताना या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे उत्कृष्ट कार्य करीत नाहीत काय, असा सवाल पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आला आहे. शासनाने अन्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र अमरावती विभागातील महसूलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे पुरस्काराच्या यादीत नव्हती, असे म्हटले आहे. राज्य शासन अती महत्त्वाचे विषय, योजना राबविण्याची जबाबदारी ही महसूल विभागावर सोपविते. ही जबाबदारी महसूलचे अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पुरस्काराने गौरविले जाऊ नये, ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हल्ली दुष्काळ, कर्ज प्रकरणे, दुष्काळ निवारण्याची कामे, मदत वाटप, रोहयो, निराधार योजना आदी महत्त्वाची कामे ही महसूल विभाग यशस्वीपणे पार पाडत आहे. असे असताना अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कनिष्ठ लिपीक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल यापैकी कोणीच उत्कृष्ट कामे करीत नाही काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. विभागातून एकाही महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड होऊ नये, ही बाब महसूल विभागासाठी खेदाची बाब आहे. यामुळे महसूल वभिागावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.