शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

नागरी सेवा पुरस्कारातून डावलला महसूल विभाग

By admin | Updated: May 9, 2016 00:14 IST

राज्य शासनाने यंदा नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्काराने गौरविले आहे

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावनाअमरावती : राज्य शासनाने यंदा नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्काराने गौरविले आहे. मात्र, या पुरस्काराच्या यादीतून महसूल विभागाला डावलल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. नागरी सेवा पुरस्कारात महसूल विभागाचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर कख्रून प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी सेवा पुरस्कार सुरू केल्याबाबत अभिनंदन केले. परंतु या पुरस्काराच्या यादीत महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी करण्यात आले नसल्याने तहसीलदार, नायब तहसीलदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून वितरित करण्यात आलेल्या पुरस्काराची यादीत महसूल विभागाला मुद्दामहून डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासकीय व्यवस्थेचा कणा महसूल विभाग असताना या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे उत्कृष्ट कार्य करीत नाहीत काय, असा सवाल पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आला आहे. शासनाने अन्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. मात्र अमरावती विभागातील महसूलचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे पुरस्काराच्या यादीत नव्हती, असे म्हटले आहे. राज्य शासन अती महत्त्वाचे विषय, योजना राबविण्याची जबाबदारी ही महसूल विभागावर सोपविते. ही जबाबदारी महसूलचे अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट पुरस्काराने गौरविले जाऊ नये, ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हल्ली दुष्काळ, कर्ज प्रकरणे, दुष्काळ निवारण्याची कामे, मदत वाटप, रोहयो, निराधार योजना आदी महत्त्वाची कामे ही महसूल विभाग यशस्वीपणे पार पाडत आहे. असे असताना अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कनिष्ठ लिपीक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल यापैकी कोणीच उत्कृष्ट कामे करीत नाही काय, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. विभागातून एकाही महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड होऊ नये, ही बाब महसूल विभागासाठी खेदाची बाब आहे. यामुळे महसूल वभिागावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.