शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

(असाईनमेंट) अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन हातचे गेले. कपाशीचे बोंडसडमुळे नुकसान झाले व पैसेवारी ४६ असल्याने ...

(असाईनमेंट)

अमरावती : जिल्ह्यात मागच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन हातचे गेले. कपाशीचे बोंडसडमुळे नुकसान झाले व पैसेवारी ४६ असल्याने दुष्काळस्थिती असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत फक्त २६ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुळे केवळ कंपन्यांचीच दुकाने भरण्यासाठीच पीक विमा काढायचा का, अशा शेतकऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा १२,४९० शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यास नकार दिला आहे.

जिल्ह्यात मागच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत १,८५,६०१ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. शेतकरी हिस्सा तसेच केंद्र व राज्य शासनाचा हप्ता मिळून ४०० कोटींवर रक्कम कंपनीकडे जमा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना विमा भरपाई फक्त ६२.६३ कोटींची देण्यात आली आहे. ७४ टक्के शेतकऱ्यांना विमा मिळालेला नसल्याने फक्त कंपनीच्याच फायद्यासाठी पीक विमा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सोयाबीन व कपाशीचे संततधार पावसाने नुकसान झाल्यामुळे याच पिकांसाठी राज्य शासनाने एसडीआरएफच्या निकषाचे बाहेर जाऊन शेतकऱ्यांना ३०० कोटींची मदत दिली होती, हे येथे उल्लेखनीय.

आठवड्यात कृषिमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यात कंपनीद्वारे शेतकऱ्यांची तक्रारींची दखल न घेण्याचा मुद्दा गाजला. त्यामुळे मंत्र्यांनी फैलावर घेतल्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी इफ्को-टोकियो या विमा कंपनीविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

बॉक्स

३९ टक्के शेतकऱ्यांचा यंदा पीक विमा

१) जिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी संख्या आहे. यापैकी १,६१,९०६ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला. हे प्रमाण ३९ टक्के आहे.

२) कंपनीद्वारा नुकसानभरपाई ठरविण्याचे सूत्र कंपनीधार्जिणे असल्यामुळे यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत १२,४९० शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविलेला नाही.

३) गतवर्षी पिकांची प्रतिकूल परिस्थिती असतानाही फक्त २६ टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पाईंटर

जिल्ह्यातील एकूण शेतकरी : ४,१५,२७०

पीक विम्यात सहभागी शेतकरी

यावर्षी : १,६१,९०६, गतवर्षी : १,८५,६०१

-----------

खरिपाचे एकूण क्षेत्र : ६,८८,७६०

कपाशी : २,२४,७१०

सोयाबीन : २,५३,६३०

तूर : १,१९,२७९

मूग : १६,४१७

उडीद : ५,९४५

ज्वारी : १४,३६०

---------

कोट

पीक विम्यात सहभागी शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे ७२ तासांच्या आत कंपनीला माहिती द्यावी. संपर्कात अडचणी येत असतील, तर कृषी किंवा तहसील कार्यालयास याची माहिती द्यावी.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

कोट

गतवर्षीचा अनुभव वाईट

गतवर्षी सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. परतीच्या पावसाने पूर्ण सोयाबीन सडले. विमा कंपनीला याची माहिती दिली. त्यांनी पाहणी केली. मात्र, भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढलेला नाही.

- सूरज देशमुख, शेतकरी

गतवर्षी कपाशी आणि सोयाबीनचा विमा काढला होता. ऑगस्टपासूनच्या पावसाने दोन्ही पिके हातची गेली. त्यामुळे शासनाची मदत मिळाली, विमा कंपनी म्हणते, या भागात उंबरठा उत्पन्न जास्त आहे.

- अरविंद वानखडे, शेतकरी