शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
4
अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले सिवानचे जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
5
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
6
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
7
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
8
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
9
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
10
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
11
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
12
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
13
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
14
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
15
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
16
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
17
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
18
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
19
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
20
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...

पाणी पिताय ना? मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले ...

संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले जाते. मात्र, आता पाणी पिताय ना? मग काळजी घ्या, अशी म्हणायची वेळ आली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाईप लाईनला लीकेजमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातून अनेक जलजन्य आजार बाळगण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यायलेले बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

अमरावती शहराकरिता अप्पर वर्धा धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणातून वषर्भरासाठी शहराकरिता ५४ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले असून वर्षाला अमरावतीकर ४५ दलघमी पाणी घेतात. प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी रोज अमरावतीला लागत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती शहरात ९१ हजार ८०० घरगुती नळ कनेक्शनधारक आहेत. ८०० वाणिज्य, तर ६३० शासकीय संस्थेला एमजीपीने नळ कनेक्शन दिले आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलोरा, कावीळ, विषमज्वर, पोटाचे विकार, हगवण लागणे, टायफाईड, जंतूची वाढ होणे तसेच इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे मत हृदय व मधुमेहविकार तज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी सांगितले.

बॉक्स:

आजराची लक्षणे

मळमळणे, वारंवार शौचास जाणे, डोळे, लघवी पिवळी होणे, ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, गॅस्ट्रो तसेच शरीरातील पाणी कमी होणे, भूक मंदावणे अशी अनेक प्रकारचे लक्षणे आढळून येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी स्पष्ट केले.

बॉक्स:

पाणी उकळून प्यायलेले बरे

जर आपल्या घरी गढूळ पाणी येत असेल, तर त्यावरून तुरटी फिरविणे, जीवन ड्रॉप टाकणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक्तेनुसार ब्लिचिंग पावडरचा वापर तसेच पावसाळ्यात सर्वांनी पाणी उकळून ते थंड करून पिणे बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स:

अमरावतीकर दररोज पितात १२५ दशलक्ष लीटर पाणी

अमरावती शहराल ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण ९३, ३९३ नळ कनेक्शनाधारक ग्राहक आहेत. त्यांना प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे यांनी सांगितले.