शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना? मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले ...

संदीप मानकर - अमरावती : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या खूप मोठी आहे. तरीही त्याकडे सर्वत्र दुर्लक्ष केले जाते. मात्र, आता पाणी पिताय ना? मग काळजी घ्या, अशी म्हणायची वेळ आली आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाईप लाईनला लीकेजमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातून अनेक जलजन्य आजार बाळगण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यायलेले बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

अमरावती शहराकरिता अप्पर वर्धा धरणातून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणातून वषर्भरासाठी शहराकरिता ५४ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले असून वर्षाला अमरावतीकर ४५ दलघमी पाणी घेतात. प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी रोज अमरावतीला लागत असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमरावती शहरात ९१ हजार ८०० घरगुती नळ कनेक्शनधारक आहेत. ८०० वाणिज्य, तर ६३० शासकीय संस्थेला एमजीपीने नळ कनेक्शन दिले आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) दूषित पाणी पिल्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलोरा, कावीळ, विषमज्वर, पोटाचे विकार, हगवण लागणे, टायफाईड, जंतूची वाढ होणे तसेच इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते, असे मत हृदय व मधुमेहविकार तज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी सांगितले.

बॉक्स:

आजराची लक्षणे

मळमळणे, वारंवार शौचास जाणे, डोळे, लघवी पिवळी होणे, ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, गॅस्ट्रो तसेच शरीरातील पाणी कमी होणे, भूक मंदावणे अशी अनेक प्रकारचे लक्षणे आढळून येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी स्पष्ट केले.

बॉक्स:

पाणी उकळून प्यायलेले बरे

जर आपल्या घरी गढूळ पाणी येत असेल, तर त्यावरून तुरटी फिरविणे, जीवन ड्रॉप टाकणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक्तेनुसार ब्लिचिंग पावडरचा वापर तसेच पावसाळ्यात सर्वांनी पाणी उकळून ते थंड करून पिणे बरे, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

बॉक्स:

अमरावतीकर दररोज पितात १२५ दशलक्ष लीटर पाणी

अमरावती शहराल ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात एकूण ९३, ३९३ नळ कनेक्शनाधारक ग्राहक आहेत. त्यांना प्रतिदिन १२० ते १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे यांनी सांगितले.