शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नका

By admin | Updated: December 26, 2015 00:21 IST

इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे.

शिक्षण विभागाचा फतवा : मुख्याध्यापक, शिक्षकांवर जबाबदारीअमरावती : इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परंतु आता अभ्यासक्रमात मागे राहिलेल्या नववीतील मुलांची तयारी करवून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक - शिक्षकांवर सोपविली आहे. त्यामुळे नववीमधील नापास मुलांची टक्केवारी यापुढे घसरणार आहे. शाळेचा निकाल उत्तम लागावा म्हणून अनेक संस्थामध्ये नववीमधील विद्यार्थ्यांना नापास केल्या जात असल्याचे प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस नववीमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्याचे व कच्या मुलांची तयारी करण्याचे ठरविण्यात आले. सद्यस्थितीत मुलामुलींचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. ते प्रमाण ५ टक्क्यावर आणण्याचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत शासनाने शिक्षण विभागाद्वारा या विषयीची योजना आखण्यात येणार आहे. नववीत नापास झाल्याने अनेकदा विद्यार्थी शाळा सोडून देतात तर काही विद्यार्थिनी शाळा सोडून देतात. तसेच काही वेळा कच्या मुलांना नापास करुन त्यांना १७ नंबरचा फार्म भरुन दहावीच्या परीक्षेला बसविण्यासाठी काही शाळा हजारो रुपये लाटत आहे. या सर्व प्रकाराला चाप बसावा यासाठी शिक्षण विभागाने ताठर भूमिका घेतली आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांंनी विद्यार्थ्यांचा कच्चा राहिलेला विषय पक्का करुन घ्यावा, अशा सूचना शिक्षण सचिवांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)दहावीप्रमाणे नववीच्याही मुलांचे मूल्यमापन अनेक शाळा दहावीच्या निकाल १०० टक्के लागावा यासाठी किमान २० टक्के विद्यार्थ्यांना नववीमध्ये नापास करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे मुलांची गळतीही कमी होत आहे. हे रोखण्यासाठी कच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी करुन घेऊन ते दहावीत कसे प्रवेश करू शकतील, याची जबाबदारी मुख्याध्यापक व विषय शिक्षकांवर राहणार आहे. कोणताही विद्यार्थी नववीत जाणून बुजुन नापास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. दहावीच्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. यापुढे नववीच्या निकालांची पडताळणी शिक्षणाधिकारी करणार आहेत.