शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
2
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
3
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
4
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
5
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
7
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
9
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
10
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
11
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
12
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
13
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
14
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
15
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
16
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
17
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
18
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
19
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
20
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ

नववीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नका

By admin | Updated: December 26, 2015 00:21 IST

इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे.

शिक्षण विभागाचा फतवा : मुख्याध्यापक, शिक्षकांवर जबाबदारीअमरावती : इयत्ता १०वीचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून नववीमधील अनेक विद्यार्थ्यांना जाणून बुजून नापास करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. परंतु आता अभ्यासक्रमात मागे राहिलेल्या नववीतील मुलांची तयारी करवून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक - शिक्षकांवर सोपविली आहे. त्यामुळे नववीमधील नापास मुलांची टक्केवारी यापुढे घसरणार आहे. शाळेचा निकाल उत्तम लागावा म्हणून अनेक संस्थामध्ये नववीमधील विद्यार्थ्यांना नापास केल्या जात असल्याचे प्रकार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले. यासंदर्भात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस नववीमधील विद्यार्थ्यांची गळती कमी करण्याचे व कच्या मुलांची तयारी करण्याचे ठरविण्यात आले. सद्यस्थितीत मुलामुलींचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. ते प्रमाण ५ टक्क्यावर आणण्याचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत शासनाने शिक्षण विभागाद्वारा या विषयीची योजना आखण्यात येणार आहे. नववीत नापास झाल्याने अनेकदा विद्यार्थी शाळा सोडून देतात तर काही विद्यार्थिनी शाळा सोडून देतात. तसेच काही वेळा कच्या मुलांना नापास करुन त्यांना १७ नंबरचा फार्म भरुन दहावीच्या परीक्षेला बसविण्यासाठी काही शाळा हजारो रुपये लाटत आहे. या सर्व प्रकाराला चाप बसावा यासाठी शिक्षण विभागाने ताठर भूमिका घेतली आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांंनी विद्यार्थ्यांचा कच्चा राहिलेला विषय पक्का करुन घ्यावा, अशा सूचना शिक्षण सचिवांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)दहावीप्रमाणे नववीच्याही मुलांचे मूल्यमापन अनेक शाळा दहावीच्या निकाल १०० टक्के लागावा यासाठी किमान २० टक्के विद्यार्थ्यांना नववीमध्ये नापास करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे मुलांची गळतीही कमी होत आहे. हे रोखण्यासाठी कच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी करुन घेऊन ते दहावीत कसे प्रवेश करू शकतील, याची जबाबदारी मुख्याध्यापक व विषय शिक्षकांवर राहणार आहे. कोणताही विद्यार्थी नववीत जाणून बुजुन नापास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. दहावीच्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. यापुढे नववीच्या निकालांची पडताळणी शिक्षणाधिकारी करणार आहेत.