शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

शिक्षक संघाची निवडणूक २0 जून रोजी होणे नाही?

By admin | Updated: May 25, 2014 23:15 IST

विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने आयोगाने घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या या एककल्ली काराभारा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने आयोगाने घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या या एककल्ली काराभारा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निकाल आयोगाच्या विरूध्द लागण्याचे संकेत असून घोषित तारखेनुसार आता २0 जून रोजी मतदान होणे नाही, असा दावा ज्वाईन्ट इंडियन टिचर्स ऑर्गनायझेशन (जितो) चे अध्यक्ष विजय गुल्हाने यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केला .

गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने २0 मे रोजी प्रसिध्दी पत्रक जारी करून महाराष्ट्र व कर्नाटकमधील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार अमरावती शिक्षक मतदारसंघात २0 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी २0 मे पासून तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली. हा निर्णय एकतर्फी, अन्यायकारक व नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उलंघन करणारा असल्यानेच आयोगाच्या या निर्णयाविरूध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान देण्यासाठी याचिका सादर करण्यात आली आहे. ही याचिका स्वीकारताना न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व विभागीय आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावून २७ मे पर्यत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. आयोगाने विदर्भाची परिस्थिती लक्षात न घेता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यापुर्वी झालेल्या निवडणुकांचा आढावा घेतला तर जून महिन्यात कधीही निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. मात्र निवडणूक आयोगाने शिक्षकांना वेठबिगार समजून आपल्या सोयीनुसार हा कार्यक्रम जाहीर केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होत असताना २0 जून रोजी निवडणूक होत आहे. हल्ली शाळा बंद असल्याने शिक्षक मतदारापर्यंत उमेदवार असे पोहचतील? असा सवाल गुल्हाने यांनी उपस्थित केला. तप्त उन,लग्न प्रसंग आदी कौटुंबिक कामानिमित्त अनेक शिक्षक मग्न आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक हे निवडणुकीपासून दूर आहेत.निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका या २0 जून रोजी न होता त्या पुढे ढकलल्या जातील, असा विश्‍वास गुल्हाने यांनी व्यक्त केला आहे.

मतदार यादीत अपात्र मतदारांची नावे आहेत. २७ हजार एवढीच मतदार संख्या असताना ४२ हजार मतदार संख्या कोठून आली हा प्रश्नसुध्दा अनुत्तरित असल्याचे ‘जितो’चे म्हणणे आहे.

शिक्षकांच्या भल्यासाठीच न्यायालयात धाव घेतली असून नक्कीच न्याय मिळून २६ जूननंतरच ही निवडणूक होईल, असा विश्‍वास गुल्हाने यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला रवींद्र कोकाटे, देशमुख, अर्डक, सुहासराव पुरतकर, सुरेंद्र शिंगणे, स्वप्नील शिंगणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)