शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शिक्षक संघाची निवडणूक २0 जून रोजी होणे नाही?

By admin | Updated: May 25, 2014 23:15 IST

विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने आयोगाने घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या या एककल्ली काराभारा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम चुकीच्या पध्दतीने आयोगाने घोषित केला आहे. निवडणूक आयोगाच्या या एककल्ली काराभारा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. निकाल आयोगाच्या विरूध्द लागण्याचे संकेत असून घोषित तारखेनुसार आता २0 जून रोजी मतदान होणे नाही, असा दावा ज्वाईन्ट इंडियन टिचर्स ऑर्गनायझेशन (जितो) चे अध्यक्ष विजय गुल्हाने यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केला .

गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने २0 मे रोजी प्रसिध्दी पत्रक जारी करून महाराष्ट्र व कर्नाटकमधील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार अमरावती शिक्षक मतदारसंघात २0 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी २0 मे पासून तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली. हा निर्णय एकतर्फी, अन्यायकारक व नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उलंघन करणारा असल्यानेच आयोगाच्या या निर्णयाविरूध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आव्हान देण्यासाठी याचिका सादर करण्यात आली आहे. ही याचिका स्वीकारताना न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग व विभागीय आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावून २७ मे पर्यत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे. आयोगाने विदर्भाची परिस्थिती लक्षात न घेता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यापुर्वी झालेल्या निवडणुकांचा आढावा घेतला तर जून महिन्यात कधीही निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. मात्र निवडणूक आयोगाने शिक्षकांना वेठबिगार समजून आपल्या सोयीनुसार हा कार्यक्रम जाहीर केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होत असताना २0 जून रोजी निवडणूक होत आहे. हल्ली शाळा बंद असल्याने शिक्षक मतदारापर्यंत उमेदवार असे पोहचतील? असा सवाल गुल्हाने यांनी उपस्थित केला. तप्त उन,लग्न प्रसंग आदी कौटुंबिक कामानिमित्त अनेक शिक्षक मग्न आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक हे निवडणुकीपासून दूर आहेत.निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय एकतर्फी असल्यामुळेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका या २0 जून रोजी न होता त्या पुढे ढकलल्या जातील, असा विश्‍वास गुल्हाने यांनी व्यक्त केला आहे.

मतदार यादीत अपात्र मतदारांची नावे आहेत. २७ हजार एवढीच मतदार संख्या असताना ४२ हजार मतदार संख्या कोठून आली हा प्रश्नसुध्दा अनुत्तरित असल्याचे ‘जितो’चे म्हणणे आहे.

शिक्षकांच्या भल्यासाठीच न्यायालयात धाव घेतली असून नक्कीच न्याय मिळून २६ जूननंतरच ही निवडणूक होईल, असा विश्‍वास गुल्हाने यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला रवींद्र कोकाटे, देशमुख, अर्डक, सुहासराव पुरतकर, सुरेंद्र शिंगणे, स्वप्नील शिंगणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)