शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

‘समानता नको; समता हवी’ आरक्षित जातींचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:26 IST

भारित सूचीकरण प्रणालीच्या माहिती व जनजागृतीसाठी शुक्रवारी खा. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या नियोजनात सायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देविकास महात्मे : भारित सूचिकरण प्रणालीच योग्य, सूचविला पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारित सूचीकरण प्रणालीच्या माहिती व जनजागृतीसाठी शुक्रवारी खा. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या नियोजनात सायकल रॅली काढण्यात आली.सकाळी ९ वाजता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हारार्पणाने रॅलीची सुरुवात झाली. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅलीत सायकल-रिक्षास्वार व दुचाकीस्वार होते. रॅलीच्या प्रारंभी भारित सूचीकरण प्रणालीची माहिती देण्यात आली. वर्तमान आरक्षण प्रणालीमध्ये प्रत्येक जाती अथवा जमातीतील केवळ १० टक्के लोकच वारंवार आरक्षणाचा लाभ घेऊन समृद्ध होत आहेत. म्हणूनच आज आरक्षणाच्या कक्षेत येऊनही मागासवर्गीय जाती जमातीतील ९० टक्के लोक लाभांपासून वंचित आहेत. ओबीसीमध्ये एक हजारांहून अधिक जातींचा समावेश आहे. पण, काही जाती फार मागास असल्याने त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचू शकत नाही. या समस्येवर तोडगा काढायचा असेल, तर आरक्षणाची टक्केवारी न बदलता सुधारणा आणाव्या लागतील. त्यासाठी खा. महात्मे यांनी भारित सूचीकरण प्रणाली सूचविली आहे.कुटुंबाचा व्यवसाय - जर भटके असतील तर ऋणात्मक गुण देऊन प्राधान्य दिले जाईल. याप्रमाणे दर वेळी नवा स्कोर तयार होईल. कमीत कमी गुण म्हणजे अधिक मागास आणि त्यांनाच आरक्षणाची अधिक गरज असल्याने त्या व्यक्तीस प्राधान्य दिले जावे, असे या प्रणालीचे स्वरूप आहे. असे जवळपास ११ मुद्द्यांवर गुणांकन असून, यामुळे जातीतील अधिक मागास गरजवंतांना आरक्षणाचे लाभ मिळू शकतील. या प्रणालीचा स्वीकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यासाठी घटनेत आरक्षण दिले, तो मूळ उद्देश पूर्ण होईल. त्यांचे स्वप्न संपूर्ण साकार करण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे खा. महात्मे म्हणाले.रॅलीच्या अखेरीस भारित सूचीकरण विषयावर व्हिडीओ दाखविण्यात आला. भारित सूचीकरण प्रणालीद्वारे समतेच्या माध्यमातून एका नवीन भारताच्या उभारणीसाठी एकत्र यावे, असे आवाहन खा. महात्मे यांनी केले.अशी आहे भारित सूचीकरण प्रणाली...: भारित सूचीकरण हे आर्थिक मुद्द्यावर आरक्षण नाही. या पद्धतीत अनेक मुद्दे विचारात घेऊन अधिक अथवा उणे गुणांक दिले जातील. उदाहरणादाखल पालिका शाळेत शिक्षण झाले असेल, ग्रामीण भागातून आलेले असतील, तर उणे गुण आणि पूर्वी आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर अधिक गुण दिले जातील, जेणेकरून पुन:पुन्हा त्याच व्यक्तीला आरक्षणात प्राधान्य मिळणार नाही. महिलांना फक्त एकदाच ऋणात्मक गुण दिले जातील. या गुणांकनात मातापित्याची शैक्षणिक पार्श्वभूमीही विचारात घेतली जाईल. आई-वडिलांचे शिक्षण जेवढे कमी, तेवढे ऋणात्मक गुण जास्त दिले जातील.