शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विशेष बदली प्रस्तावाला विभागीय आयुक्तांचा नकार

By admin | Updated: September 2, 2014 23:24 IST

जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर

अमरावती :जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत ३० आॅगस्ट रोजी दिले आहेत. या सूचनेचे पालन करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुख यांच्या नावाने लेखी आदेश काढले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब, बदलीचे प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे शिफारशीने विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येतात. दरम्यान या मुद्दावर विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बाजु ऐकून यापुढे जिल्हा परिषदेतील विशेष बाब बदलीचे प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीत विभागीय आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवू नयेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुखांनी विशेष बाब बदलीचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे शिफारशीसाठी पुढील आदेशापर्यंत पाठवू नये, अशा स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी एका लेखी आदेशाव्दारे काढले आहेत. त्यामुळे विशेष बदलीसाठी धडपणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा पूर्ण हिरमोड होणार आहे. त्यामुळे आयुक्तांचा पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)