शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:30 IST

स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.

ठळक मुद्दे१० वी, १२ वीला शिक्षक नाही : दोन महिन्यांपासून स्थिती गंभीर, विद्यार्थी वाऱ्यावर, पालक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.राज्य शासनाने विशेष आदेशाने शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला या गंभीर आजाराची लस प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी विशेष पालकसभेचे आयोजन केले होते. पालकांबाबत या लसी योजनेची जागृती व्हावी, यासाठी सर्व पालकांना आमंत्रित केले होते. आरोग्य विषयाबाबतीत ४० मिनिटांचा विषय संपताच पालकांनी जि. प. शाळेतील गंभीर तक्रारींचा पाढाच वाचला. यावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा जि. प. चे प्राचार्य इंगळे यांनी सर्व पालकांनी एका एकानी प्रश्न व नाव सांगावे, गोंधळ करू नये, असे बजावताच प्रत्येक पालकांनी गंभीर विषयाला घात घातला. मोहोड, पांडूरंग डोंगरे, सारिका यादव, मुकुंदराव यादव, चेतना तायडे यांनी विविध विषयाची सरबत्ती केली. यात ९ वी, १० वीचा गणित विषयाचा दोन महिन्यांपासून पिरीयड होत नाही. १० वी, १२ वीला केमिस्ट्री, बॉयलॉजी, गणिताचे तीन शिक्षक नाही. वर्ग ६ ते ८ ला दोन शिक्षक नाही, असे पाच शिक्षक कमी असणे ही बाब गंभीर आहे. तसेच १० वी, १२ वीचे विज्ञानाचे प्रॅक्टीकल दोन महिन्यापासून बंद आहे. विशेष प्रवर्गाला विद्यार्थ्यांना अनुदान असता खुला वर्गातील विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याची सक्ती १० वी, १२ वी शिक्षण शिकविण्याचे बोर्ड डिजीटल नसल्याने साधे बोर्डावरचे शिक्षकाचे लेखी काम विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसत नाही. आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही. या मुद्यावरून पालकसभेत गदारोळ झाला. शाळा व्यवस्थापन समितीबाबत पुढील कार्यवाही केली किंवा नाही, असेही प्रश्न विचारण्यात आले. शाळेत शिक्षक गृहपाठ देत नाही. दिले तर त्याची तपासणी होत नाही, अशा विविध मुद्यांनी सभेत गरमागरमी होत होती. मनुष्यबळाचा अभाव व शाळेला तटरक्षक भिंत नसल्याने शाळेसमोर विविध समस्या आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्राचार्य इंगळे यांनी म्हणाले. सभेला १२३ पालक उपस्थित होते. त्यात ८२ महिला पालकांचा समावेश होता. महिला पालकांनीच प्रश्नांची सरबत्ती केली.शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नाहीजिल्हा परिषद शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याने वरिष्ठ अधिकारी असतानादेखील कोणताही अधिकारी शाळेला भेट देत नसल्याची चर्चा पालकात दिसून आली.