शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा परिषद शाळेत गंभीर प्रश्नांच्या भडीमाराने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:30 IST

स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.

ठळक मुद्दे१० वी, १२ वीला शिक्षक नाही : दोन महिन्यांपासून स्थिती गंभीर, विद्यार्थी वाऱ्यावर, पालक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दिले.राज्य शासनाने विशेष आदेशाने शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला या गंभीर आजाराची लस प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावी, यासाठी विशेष पालकसभेचे आयोजन केले होते. पालकांबाबत या लसी योजनेची जागृती व्हावी, यासाठी सर्व पालकांना आमंत्रित केले होते. आरोग्य विषयाबाबतीत ४० मिनिटांचा विषय संपताच पालकांनी जि. प. शाळेतील गंभीर तक्रारींचा पाढाच वाचला. यावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा जि. प. चे प्राचार्य इंगळे यांनी सर्व पालकांनी एका एकानी प्रश्न व नाव सांगावे, गोंधळ करू नये, असे बजावताच प्रत्येक पालकांनी गंभीर विषयाला घात घातला. मोहोड, पांडूरंग डोंगरे, सारिका यादव, मुकुंदराव यादव, चेतना तायडे यांनी विविध विषयाची सरबत्ती केली. यात ९ वी, १० वीचा गणित विषयाचा दोन महिन्यांपासून पिरीयड होत नाही. १० वी, १२ वीला केमिस्ट्री, बॉयलॉजी, गणिताचे तीन शिक्षक नाही. वर्ग ६ ते ८ ला दोन शिक्षक नाही, असे पाच शिक्षक कमी असणे ही बाब गंभीर आहे. तसेच १० वी, १२ वीचे विज्ञानाचे प्रॅक्टीकल दोन महिन्यापासून बंद आहे. विशेष प्रवर्गाला विद्यार्थ्यांना अनुदान असता खुला वर्गातील विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्याची सक्ती १० वी, १२ वी शिक्षण शिकविण्याचे बोर्ड डिजीटल नसल्याने साधे बोर्डावरचे शिक्षकाचे लेखी काम विद्यार्थ्यांना स्पष्टपणे दिसत नाही. आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही. या मुद्यावरून पालकसभेत गदारोळ झाला. शाळा व्यवस्थापन समितीबाबत पुढील कार्यवाही केली किंवा नाही, असेही प्रश्न विचारण्यात आले. शाळेत शिक्षक गृहपाठ देत नाही. दिले तर त्याची तपासणी होत नाही, अशा विविध मुद्यांनी सभेत गरमागरमी होत होती. मनुष्यबळाचा अभाव व शाळेला तटरक्षक भिंत नसल्याने शाळेसमोर विविध समस्या आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे प्राचार्य इंगळे यांनी म्हणाले. सभेला १२३ पालक उपस्थित होते. त्यात ८२ महिला पालकांचा समावेश होता. महिला पालकांनीच प्रश्नांची सरबत्ती केली.शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नाहीजिल्हा परिषद शाळेवर शिक्षण विभागाचा अंकुश नसल्याने वरिष्ठ अधिकारी असतानादेखील कोणताही अधिकारी शाळेला भेट देत नसल्याची चर्चा पालकात दिसून आली.