शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

परतवाडा : अमरावती जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगर पालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या ...

परतवाडा : अमरावती जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याचा अचलपूर नगर पालिकेला विसर पडला आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनारुग्णांची संख्या शून्य असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा जयघोष अचलपूर नगरपालिका कचरा गाडीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात आजही करीत आहे.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रात घरोघरी गाड्या कचरा संकलन करीत आहेत. नगरपालिका क्षेत्रात दररोज फिरणाऱ्या या गाड्यांवर ध्वनिक्षेपक बसविण्यात आले आहेत. या ध्वनिक्षेपकावर स्वच्छ भारत सुंदर भारतची कॅसेट वाजविली जात आहे. याच दरम्यान या ध्वनिक्षेपकावरून शहरातील नागरिकांना एक आवाहन केले जात आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्कचा वापर करा, हात धुवा असे या ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सुचित केल्या जात आहे. यावर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या कधी एक तर कधी दोन, बरेचदा शून्य ही निघत असल्याची आकडेवारी शल्यचिकित्सकांकडून जाहीर केली जात आहे. ज्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या त्यादिवशी जिल्हा कोरोना मुक्त झाल्याचा आनंदही व्यक्त केला जात आहे. असे असतानाही अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याचे अचलपूर नगरपालिकेकडून दररोज जाहीर केले जात आहे.

प्रत्यक्षात कोरोना रुग्णांअभावी कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालय ओस पडले आहे. अचलपूर नगर परिषदेच्या विद्यालयातील कोरोना टेस्टिंग सेंटरही मागील एक महिन्यापासून बंद करण्यात आले आहे.एवढेच नव्हे तर कोरोना रुग्ण निघत नसल्यामुळे काही कर्मचारी वर्गही कमी करण्यात आला आहे. पण, या बदलत्या परिस्थितीचा विसर पडल्यामुळे की काय अचलपूर नगर परिषदेकडून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचा जयघोष आजही कचरा गाड्यांवरून केला जात आहे.

दिनांक17/09/21 फोटो