शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पीक परिस्थितीची पाहणी

By admin | Updated: August 17, 2014 22:54 IST

जुलै व आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील ८२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु मंत्रालयाच्या बैठकीनंतर

नैसर्गिक आपत्ती : शासनाकडे अहवाल पाठविणारदर्यापूर : जुलै व आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात झालेल्या पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील ८२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु मंत्रालयाच्या बैठकीनंतर हे नुकसान जास्त असल्यामुळे पुन्हा पाहणी करून सुधारित अहवाल पाठविण्याचे निर्देश होते. त्यामुळे जिल्हाधिकारी किरणकुमार गीत्ते यांनी रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही दर्यापूर व भातकुली तालुक्यातील शेतात जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. ज्या भागात सर्वाधिक नुकसान आहे त्या ठिकाणी ही पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी अतिवृष्टीनंतरही पिकांमध्ये सुधारणा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तातडीने मंगळवार, बुधवारपर्यंत अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भातकुली, आमला, शिंगणापूर, वडूरा येथे भेटी दिल्या. इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहूल तायडे, मंडल अधिकारी शहाणे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली असता यावेळी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत चर्चा केली. तालुक्यातील रखडलेले पुनर्वसन पूर्ण करावे, स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक पद भरावे व दर्यापूर आगारावर आगार व्यवस्थापकाची नेमणूक करावी आदी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)