शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी केवळ नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती ...

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती नागरिक आणि कोण-कोण आहेत, याची पाटी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोरीच असल्याचे दिसून येत आहे.

सध्या प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे. अनेक गावांना तंटामुक्ती पुरस्कार मिळालेत. परंतु या समितीचे अध्यक्ष वगळता इतर सहभागी सदस्यांची नागरिकांना माहितीच नसते. तंटामुक्त समितीचे फलक ग्रामपंचायतीत लावणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीत समितीचे फलक नसल्याचे निदर्शनास येत आहे. न्याय व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी व्हावेत. दिवाणी दावे, बांधावरील वाद व गावातील किरकोळ वाद गावांमध्ये मिटविण्यासाठी शासनाने गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आणली. या योजनेत ग्रामसभेतून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवडले जाते. त्यांच्या खालोखाल सर्व समावेशक सदस्यांची निवड केली जाते. परंतु यातील सदस्यांची नावे राजकीय कुरघोड्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात अजूनही तंटामुक्त अभियानाबाबत पूर्णपणे जाणीव जागृती झालेली दिसत नाही. गावातील कोणताही तंटा मिटविताना या तंटामुक्त समितीत जे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना तंटे मिटविण्यासाठी बोलणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच गावांमध्ये सदस्यऐवजी फक्त अध्यक्षांना तंटे मिटविण्यासाठी बोलविले जाते. गाव पातळीवर गावाच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षापासून ते सर्व सदस्यांपर्यंत ज्यांची निवड झाली, त्यांना सर्वांना मदत केली जात नसल्याने त्या सदस्यांमध्ये नाराजी पसरत आहे. ही योजना अजूनही बळकट व सक्षम करण्यासाठी गावपातळीवर या अभियानाला बळकटी मिळण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी १५ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. गावात तंटे होऊ नयेत, दाखल आणि नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच लोकसहभागातून मिटून ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, असा यामागील उद्देश आहे. यासाठी ग्रामसभेतून तंटामुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश होते. सुरुवातीला पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्यानंतर याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही मोहीम मंदावली आहे.