शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी केवळ नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती ...

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती नागरिक आणि कोण-कोण आहेत, याची पाटी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोरीच असल्याचे दिसून येत आहे.

सध्या प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे. अनेक गावांना तंटामुक्ती पुरस्कार मिळालेत. परंतु या समितीचे अध्यक्ष वगळता इतर सहभागी सदस्यांची नागरिकांना माहितीच नसते. तंटामुक्त समितीचे फलक ग्रामपंचायतीत लावणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीत समितीचे फलक नसल्याचे निदर्शनास येत आहे. न्याय व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी व्हावेत. दिवाणी दावे, बांधावरील वाद व गावातील किरकोळ वाद गावांमध्ये मिटविण्यासाठी शासनाने गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आणली. या योजनेत ग्रामसभेतून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवडले जाते. त्यांच्या खालोखाल सर्व समावेशक सदस्यांची निवड केली जाते. परंतु यातील सदस्यांची नावे राजकीय कुरघोड्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात अजूनही तंटामुक्त अभियानाबाबत पूर्णपणे जाणीव जागृती झालेली दिसत नाही. गावातील कोणताही तंटा मिटविताना या तंटामुक्त समितीत जे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना तंटे मिटविण्यासाठी बोलणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच गावांमध्ये सदस्यऐवजी फक्त अध्यक्षांना तंटे मिटविण्यासाठी बोलविले जाते. गाव पातळीवर गावाच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षापासून ते सर्व सदस्यांपर्यंत ज्यांची निवड झाली, त्यांना सर्वांना मदत केली जात नसल्याने त्या सदस्यांमध्ये नाराजी पसरत आहे. ही योजना अजूनही बळकट व सक्षम करण्यासाठी गावपातळीवर या अभियानाला बळकटी मिळण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी १५ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. गावात तंटे होऊ नयेत, दाखल आणि नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच लोकसहभागातून मिटून ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, असा यामागील उद्देश आहे. यासाठी ग्रामसभेतून तंटामुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश होते. सुरुवातीला पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्यानंतर याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही मोहीम मंदावली आहे.