शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी केवळ नामधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती ...

अमरावती : ग्रामीण भागात गावपातळीवर तंटा मिटविण्याकरिता महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन केली जाते. परंतु, या तंटामुक्त समितीमध्ये किती नागरिक आणि कोण-कोण आहेत, याची पाटी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कोरीच असल्याचे दिसून येत आहे.

सध्या प्रत्येक गावात ही समिती कार्यरत आहे. अनेक गावांना तंटामुक्ती पुरस्कार मिळालेत. परंतु या समितीचे अध्यक्ष वगळता इतर सहभागी सदस्यांची नागरिकांना माहितीच नसते. तंटामुक्त समितीचे फलक ग्रामपंचायतीत लावणे बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीत समितीचे फलक नसल्याचे निदर्शनास येत आहे. न्याय व्यवस्थेवरील ताण काही प्रमाणात कमी व्हावेत. दिवाणी दावे, बांधावरील वाद व गावातील किरकोळ वाद गावांमध्ये मिटविण्यासाठी शासनाने गाव पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती योजना अमलात आणली. या योजनेत ग्रामसभेतून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवडले जाते. त्यांच्या खालोखाल सर्व समावेशक सदस्यांची निवड केली जाते. परंतु यातील सदस्यांची नावे राजकीय कुरघोड्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात अजूनही तंटामुक्त अभियानाबाबत पूर्णपणे जाणीव जागृती झालेली दिसत नाही. गावातील कोणताही तंटा मिटविताना या तंटामुक्त समितीत जे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना तंटे मिटविण्यासाठी बोलणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच गावांमध्ये सदस्यऐवजी फक्त अध्यक्षांना तंटे मिटविण्यासाठी बोलविले जाते. गाव पातळीवर गावाच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षापासून ते सर्व सदस्यांपर्यंत ज्यांची निवड झाली, त्यांना सर्वांना मदत केली जात नसल्याने त्या सदस्यांमध्ये नाराजी पसरत आहे. ही योजना अजूनही बळकट व सक्षम करण्यासाठी गावपातळीवर या अभियानाला बळकटी मिळण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स

गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी १५ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. गावात तंटे होऊ नयेत, दाखल आणि नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच लोकसहभागातून मिटून ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, असा यामागील उद्देश आहे. यासाठी ग्रामसभेतून तंटामुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश होते. सुरुवातीला पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्यानंतर याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही मोहीम मंदावली आहे.