शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

अचलपुरात आजारांचा फैलाव

By admin | Updated: August 4, 2014 23:30 IST

वातावरणात होणारा बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा पाऊस यामुळे वेगवेगळ्या आजारांनी शहरात थैमान घातले असून जुळ्या शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे.

अचलपूर : वातावरणात होणारा बदल, तापमानातील चढ-उतार व अवेळी येणारा पाऊस यामुळे वेगवेगळ्या आजारांनी शहरात थैमान घातले असून जुळ्या शहरातील स्वच्छतेकडे नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.सर्दी, खोकला, थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे, कंबर दुखी, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजारांचे प्रमाण वाढू लागल्याने अचलपूर-परतवाड्यातील खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. उपजिल्हा रुग्णालयातही बाह्यरुग्णांची संख्या वाढली आहे. अधून-मधून पावसाची रिपरीप सुरुच आहे. यामुळे तालुक्यातील गावागावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने विविध आजारांत वाढ होत आहे. मात्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य उपचार घेतल्यास हे आजार बरे होऊ शकतात. हवा आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणुंमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, उलट्या होणे, घसादुखी, अतिसार यासारख्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येवरुन ही बाब दिसून येत आहे. साथीची लागण सुरु असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रकल्पात, विहिरींमध्ये आणि नदीला नवीन पाणी आल्यानेही गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळेच जलजन्य आजार वाढत आहे. (शहर प्रतिनिधी)