शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

तूर पिकावर मर रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST

शेतकरी चिंतेत : धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेतकºयांची खरिपातील प्रत्येक हंगाम गार होत असल्याने अखेर तूर पिकावर मदार असताना ...

शेतकरी चिंतेत :

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील शेतकºयांची खरिपातील प्रत्येक हंगाम गार होत असल्याने अखेर तूर पिकावर मदार असताना अचानक आलेल्या मर रोगामुळे तुरीची झाड वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकºयांना यावर्षी अनेक संकटाचा सामना करावा लागला. तरीही शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून उसनवारीवर सोयाबीन, कपाशीची पेरणी केली. सुरुवातीच्या काळात बोगस बियाणेने शेतकºयांचे कंबरडे मोडले. दुबार पेरणीनंतर पावसाने साथ दिली. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे शेंगा भरल्या नाही. जेमतेम आलेला सोयाबीन काढणीच्या ऐन वेळेत पावसाने तेही खराब झाले.कपाशीला बोंडअळीचा मार बसला. त्यामुळे रबीतील अखेरचे तूर या पिकावर अनेक महागडी औषधे फवारणी केल्याने तूर पीक जोमात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून झाडे वाळत असल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे.

परिसरात अनेक शेतकºयांनी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्यामुळे घरचे बियाणे वापरले. त्यावर अनेक प्रकारची फवारणी करून अपेक्षित उत्पन्न घेण्याचे शेतकºयांनी ठरविले. तूर पीक जोमदार दिसत होते. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र त्यावर नेमका कोणता रोग आला हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. तालुक्यात अनेक शेतकरी आपसात गप्पा करत असताना हा रोग तुरीवर आलेला मर रोग असावा, असे मत व्यक्त होत आहे.